01:32pm | Oct 13, 2020 |
पुसेगाव: वेणेगाव येथील येथील जमिनीवरून वाद निर्माण झाला असून शेतातील ऊस पेटवून 2 लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी चंद्रकांत लक्ष्मण जाधव (रा. वेणेगाव) याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहित मानसिंग काटे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर 80 ते 90 जणांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार श्री. काटे यांच्या आजोबांच्या नावे वेणेगाव येथील माळ नावाच्या शिवारात गट नंबर 270/1 मध्ये 80 गुंठे शेतजमीन आहे. याबाबत तहसीलदार यांनी गावात बैठक घेऊन याबाबत दोन्ही पार्टीच्या लोकांना वादाच्या अनुषंगाने पुरावे सादर करण्यास सांगितले होते. तर सदर पुरावे तहसीलदार यांच्या अधिकार क्षेत्रात असतील तर आदेश देता येईल अन्यथा अधिकार क्षेत्राबाहेर असतील तर आपण दिवाणी न्यायालयात दाद मागावी असेही तहसीलदार यांनी सांगितले होते.
दरम्यान ही बैठक संपल्यानंतर सर्वजण घरी गेल्यानंतर तक्रारदार यांच्या शेतात काम करणारा सालगडी मोरे यांनी तक्रारदार यांना सायंकाळी 4 :40 च्या सुमारास आपल्या शेतातील उसाचे पीक चंद्रकांत लक्ष्मण जाधव याने काडीपेटीच्या साह्याने पेटवून 2 लाख रुपयांचे नुकसान केले असल्याचे सांगितले. याप्रकरणी जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेणेगाव येथील जमिनीचा वाद उफळत चालला असून तहसीलदार यांनी ही याबाबत याठिकाणी बैठक घेतली होती. मात्र हा वाद आता विकोपाला जाऊन पोहचला आहे. शेतातील नुकसान करण्याबरोबरच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उलघन करणार्यांवर गुन्हे दाखल होऊ लागले आहेत.
आम्ही कसत असणारी जमीन ही 1912 पासून आमच्या मालकी हक्काची आहे. गावकर्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती जमीन जर गायरान आहे तर त्यांनी सनदशीर मार्गाने लढा द्यावा. गावातील ठराविक वाळूसाम्राट व गुंडप्रवृत्तीचे लोक गावकर्यांना हाताला धरून आमच्या पिकांचे नुकसान करत आहेत. शेतकरी त्याचे पीक पिकवताना स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवत असतो आणि जर त्याचे नुकसान होत असेल तर किती त्रास होतो हे फक्त शेतकर्यालाच कळेल. बोरगाव पोलीस स्टेशनचे वाघ साहेब यांनी गावात बंदोबस्त दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार..पण तरी सुद्धा शेतीचे नुकसान होत आहे.
- मोहित काटे, युवा शेतकरी
प्रशासनाने दहशद मोडण्याची गरज
वेणेगावात गेल्या काही दिवसांपासून गायरान शेत जमिनीचा वाद वाढत चालला आहे. गावात काही जणांकडून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि संबंधित प्रशासनाने गावातील दहशद मोडीस काढणे गरजेचे असल्याचे मत गावातील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |