जगभरातील विविध देशांमध्ये कोरोना महामारीचे संकट वाढत जात असताना आजच्या घडीला सुप्रसिद्ध अर्थतज्ञ थॉमस रॉबर्ट माल्थस यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. जगभरात निर्माण झालेले कोरोना संकट अधिकच गंभीर होत जात आहे. जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या अत्यंत जलद गतीने वाढत आहे. कोरोना महामारीची सुरुवात जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमधून झाली आणि सध्या लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्याच क्रमांकावर असणार्या भारतासारख्या महाकाय देशामध्ये त्याचा फैलाव अत्यंत जलद गतीने होत जाणे या बाबी थॉमस माल्थस यांनी दिलेल्या संकेतांशी मिळत्याजुळत्या आहेत.
थॉमस रॉबर्ट माल्थस हा अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जगासमोर आलेला एक सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, अर्थशास्त्राचा प्राध्यापक, लोकसंख्या शास्त्राचा अभ्यासक ज्याचा जन्म इंग्लंडमधील वेस्टकॉट या शहरामध्ये 13 फेब्रुवारी 1766 मध्ये झाला. जगभरातील विविध देशांमध्ये अभ्यास दौरे करून, लोकसंख्या विषयक अभ्यास करून लोकसंख्याविषयक जगप्रसिद्ध सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. यालाच माल्थसचा लोकसंख्या विषयक सिद्धांत असे म्हटले जाते. या सिद्धांतामध्ये थॉमस माल्थस यांनी लोकसंख्येची वाढ, उपलब्ध साधनसंपत्ती, अन्नधान्याच्या उत्पादनातील वाढ, लोकसंख्येचे नियंत्रण, लोकसंख्येचे नैसर्गिक नियंत्रण अशा विविध पैलूंवर दृष्टीक्षेप टाकलेला होता. लोकसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून थॉमस माल्थस यांनी 1798 मध्ये आपल्या An Essay on Principles of Population या ग्रंथातून प्रचंड लोकसंख्या वाढली असता आणि मनुष्याने स्वतःहून लोकसंख्या नियंत्रणात ठेवली नाही तर लोकसंख्येचे नियंत्रण करण्यासाठी नैसर्गिक नियंत्रण कसे सुरू होऊ शकते, याचा उहापोह केलेला होता. माल्थस यांनी आपल्या सिद्धांतांमध्ये केलेल्या मांडणीमध्ये लोकसंख्या वाढीचे नैसर्गिक नियंत्रण हे भयानक व निराशादायक असणार आहे, असे कथन केले होते. तत्कालीन तज्ञ व्यक्तींनी थॉमस माल्थस याचा विचाराचा धिक्कार केला. थॉमस माल्थस हा जगासमोर निराशावादी वातावरण निर्माण करत आहेत, लोकांमध्ये निरुत्साह निर्माण करत आहेत अशा प्रकारचे आरोप माल्थस यांच्यावर लावण्यात आले. थॉमस माल्थस यांच्या सभा, त्यांची भाषणे यावर बहिष्कार टाकला जाऊ लागला. थोडक्यात, थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामाविषयी व त्याच्या नैसर्गिक नियंत्रण याविषयी जे मत मांडले होते ते तत्कालीन परिस्थितीमध्ये जनतेसमोर समाजासमोर एक निराशावादी चित्र निर्माण करणारे आहे अशा प्रकारचा समज पसरविण्यात आलेला होता. परंतु कोणास माहीत होते की, थॉमस माल्थस यांनी 1798 मध्ये सिद्धांतांमध्ये मांडलेल्या बाबी एकविसाव्या शतकात सर्व जगासमोर खूप मोठे संकट म्हणून उभे राहतील. परंतु आज आपण हे भयाण वास्तव संपूर्ण जगभरामध्ये अनुभवत आहोत, त्यामुळे आज आपण पुन्हा थॉमस माल्थस या अर्थतज्ञाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
थॉमस माल्थस जिवंत असताना त्यांनी सांगितलेल्या विचाराकडे आणि त्यांच्या सिद्धांताकडे तत्कालीन समाजव्यवस्थेने सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले. किंबहुना त्यांच्या विचारांची हेळसांड केली. परिणामी त्यांना आपल्या विचारसरणीचा फार मोठा प्रसार करता आला नाही. मात्र त्यांची लेखणी बंद राहिली नाही. ते नेहमीच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला, समाजधुरिणांना, राज्यकर्त्यांना या गोष्टीची सतत आठवण करून देत राहीले, भविष्यात वाढून ठेवलेल्या प्रश्नांचे संकेत देत राहीले. मात्र दुर्दैव की, त्यांच्या या विचाराकडे धोरणकर्त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. त्याचे विपरीत परिणाम जगभरातील विविध देशांमध्ये एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकात देखील पाहावे लागले. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात नैसर्गिक आपत्ती महापूर रोगराई यासारखे अनेक संकेत निसर्गाने दिले. परंतु या संख्येत आकडे देखील आपण दुर्लक्षित केले.
थॉमस माल्थस यांच्या मते लोकसंख्या ही भूमिती पद्धतीने वाढत असते, तर अन्नधान्याचे उत्पादन हे गणिती पद्धतीने वाढत असते. म्हणजेच लोकसंख्या 1,2,4,8,16,32..., या पद्धतीने वाढत असते, तर अन्नधान्याचे उत्पादन 1,2,3,4,5,6..., या पद्धतीने वाढते असते. भविष्यात लोकसंख्या जलद गतीने वाढत गेल्यास देशातील अन्नधान्याचे साठे व अन्नधान्याची मागणी यामध्ये असमतोल निर्माण होतो. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरता निर्माण होऊ लागते. अशा परिस्थितीत अनेक विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. वाढलेल्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेले प्रश्न किंवा समस्या नियंत्रणात आणण्यासाठी स्वतः मानवाने आपली लोकसंख्या नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक असते. मात्र मानवाने स्वतःहून ही लोकसंख्या नियंत्रणात ठेवली नाही तर मग मात्र या लोकसंख्येचे नियंत्रण निसर्ग स्वतः आपल्याकडे घेतो. परंतु जेव्हा निसर्ग स्वतः लोकसंख्या नियंत्रणाचे अस्त्र हातात घेतो, तेव्हा त्याचे लोकसंख्या नियंत्रणाचे मार्ग अत्यंत भयानक असतात, क्लेशदायक असतात. कारण वाढलेली लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी निसर्गाद्वारे विविध आपत्ती, महामारी निर्माण केल्या जातात. ज्यामध्ये महापूर, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, दुष्काळ, महामारी, रोगराई यांसारख्या मार्गाने निसर्ग वाढलेल्या लोकसंख्येचे नियंत्रण करू लागतो. आणि हे नियंत्रण क्लेशदायक व त्रासदायक असते. म्हणून जनतेने स्वतःहून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. थॉमस माल्थस यांनी हे देखील स्पष्ट केले होते की, जर लोकसंख्या अशीच वाढत गेली आणि संसाधनांची कमतरता निर्माण होऊ लागली तर समाजात व्याभिचार, भ्रष्टाचार व गैरवर्तन वाढत जाईल. त्याचबरोबर संसाधने मिळवण्यासाठी मोठी युद्धे होतील, तसेच नैसर्गिक कोप देखील होऊ शकेल. आज ही बाब जर आपण तपासून पाहिले तरी याची सत्यता जगभरातील विविध देशांमध्ये आपणास पहावयास मिळत आहे. समाजात भ्रष्टाचार वाढत आहे, व्यभिचार वाढत आहे, संस्कृती लोप पावत चाललेली आहे, गैरवर्तन वाढत आहे, मोठमोठ्या देशांमध्ये युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.
जगातील लोकसंख्या वाढीचा दर आणि लोकसंख्येमधील प्रत्यक्षातील वाढ या सर्व बाबींचा जर आढावा घेतला तर असे दिसून येते सन 1951 मध्ये जगात सरासरी प्रति किलो मिटर मध्ये वास्तव्य करणार्या लोकसंख्येचे प्रमाण हे 17 एवढे होते. मात्र सध्या हे प्रमाण 52 झालेले आहे. तर दुसरीकडे जगातील साधनसंपत्ती, जमीन, पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती यामध्ये वाढ झालेली नाही. उलट उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा वारेमाप व बेफिकीरीने वापर केल्यामुळे पुनर्नविकरण साधनसंपत्ती कमी होत चाललेली आहे. नवीकरणक्षम साधनसंपत्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट झालेली नसली तरी या साधन संपत्तीचे प्रचंड प्रमाणात प्रदूषण झालेले आपणास पहावयास मिळत आहे. हवा व पाणी यांसारख्या पुनर्नवीकरणक्षम साधनसंपत्तीचा विचार करता त्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या खूप मोठी घट झालेली नसली तरी पाणी प्रदूषण व हवा प्रदूषण सातत्याने वाढत असल्याचे आपणास दिसून येत आहे. शेतजमिनीचा वापर अन्नधान्याच्या उत्पादनासाठी न करता सिमेंटची जंगले उभी करण्यासाठी केला जात आहे, जंगल संपत्ती तोडली जात आहे व तेथे सिमेंटची जंगले, कारखाने, उत्पादन संस्था व शहरे स्थापन केली जात आहेत. म्हणजेच एकीकडे वाढत जाणारी प्रचंड लोकसंख्या व त्यांना हव्या असणार्या वस्तू व सेवांची मागणी तर दुसरीकडे या वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अस्तित्वात असणारी नवीकरणक्षम व पुनर्नवीकरणक्षम साधन संपत्तीचा र्हास व प्रदूषण अशा दुहेरी अडचणींमध्ये आपण सापडलेलो आहोत. किंबहुना याचा विपरीत परिणाम म्हणून जगातील सर्व देशांमध्ये सार्वजनिक यंत्रणा, नैसर्गिक यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. परिणामी या यंत्रणा कोलमडून पडत असताना देखील आपण पहात आहोत. चीन व भारतासारख्या महाकाय देशांमध्ये या समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. याचाच योगायोग की काय माहित नाही, परंतु या कोरोनासारख्या महाभयंकर महामारीची सुरुवात चीन सारख्या सर्वाधिक लोकसंख्या असणार्या देशातूनच झाली आणि त्याचा विस्तार प्रसार आज भारतासारख्या महाकाय व अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये अधिक प्रमाणात पसरत आहे, हे देखील थॉमस माल्थसच्या भारतीय लोकसंख्या विषयक सिद्धांताला धरूनच घडत आहे.
भारताचाच जर आपण विचार केला तर आपणास असे दिसून येईल 1955 मध्ये लोकसंख्येची घनता 138 एवढी होती. 1980 मध्ये ती 234 इतकी झाली. 2018 मध्ये ती 455 पर्यंत पोहोचली. शहरी लोकसंख्येचे प्रमाण याच कालावधीत 17.6 क्यांसे वरून 32.5 टक्क्यांवर पोहोचलेले आहे. हे आकडे वाढत्या लोकसंख्येचे प्रतीक आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातच नव्हे तर ग्रामीण भागांमध्ये देखील विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. निसर्गाचे नियंत्रण सुरू झालेले आहे. याचे अनेक पुरावे इतिहासात आणि वर्तमानात पहावयास मिळतात. सन 1931 मध्ये चीनमधील पुरामध्ये दहा लाख लोक, 1970 मध्ये पूर्वीच्या बांगलादेशमध्ये भोला वादळात पाच लाख लोक, 1920 आणि 1976 या वर्षात चीनमधील भूकंपात सुमारे 18 लाख लोक, 2004 मधील इंडोनेशिया मधील भूकंप तीन लाख लोक, भारतात 1896 ते 1902 पर्यंत च्या दुष्काळात 60 लाख लोक, सन 1942 मधील चीन च्या दुष्काळात 20 लाख लोक भूकबळी बळीने मृत्युमुखी पडले, 2010 मध्ये रशियात उष्माघाताने 56 हजार लोक ,2003 मध्ये युरोपमध्ये 70 हजार लोक, 2008 मध्ये म्यानमारमधील वादळात दोन लाख लोक मृत्युमुखी पडले. भारताच्याच बाबतीत सांगायचे झाले तर 2004 मधील त्सुनामी मध्ये दोन लाख लोकांचा मृत्यू झाला, 2001 मधील गुजरातमधील भूकंपात वीस हजार लोक मृत्युमुखी पडले, तर लाखो लोक अपंग झाले. 2004 मध्ये अंदमान सुमाग बेटावरील भूकंपात दोन लाख लोक मृत्युमुखी पडले, 1943 मधील बंगालच्या दुष्काळात 40 हजार लोक, 1993 मधील लातूर च्या भूकंपात वीस हजार पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले. 1999 च्या ओरिसामधील दुष्काळात दहा हजार लोक, 2013 मधील उत्तराखंडमधील पूर व भूस्खलनमध्ये 5000 लोक अशी कित्येक उदाहरणे देता येतील. याबरोबरच जगातील विविध देशाबरोबरच भारतात देखील अनेक भयानक रोग जसेकी एड्स, कॅन्सर, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू, इबोला इत्यादी जंतुसंसर्ग सातत्याने वाढत असल्याचे आपणास पहावयास मिळत आहे. या सर्व बाबी पाहता आपणास एक बाब निश्चितपणे मान्य करावी लागेल निसर्गाचे नियंत्रण सुरू झालेले आहे. थॉमस माल्थस यांनी सांगितल्याप्रमाणे निसर्गाचे नियंत्रण असणार आहे निर्दयी पद्धतीने लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न निसर्गाकडून केला जाईल. भारतातीलच नव्हे तर जगातील लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी निसर्गाचे क्रुर नियंत्रण सुरू झालेले आहे. अशा प्रकारचे नियंत्रण सुरू करण्यापूर्वी निसर्गाने अनेक संकेत मानवी समाजास दिलेले होते, परंतु आपण त्याकडे सतत दुर्लक्ष करत गेलो हे दुर्लक्ष करत गेल्यामुळे की काय, आज आपण कोरोना महामारीसारख्या अत्यंत भयानक निराशावाद निर्माण करणार्या क्रूर पद्धतीने हताश होऊन मृत्युमुखी पडणारी मानव जमात आपण आपल्या डोळ्यादेखत पाहत आहोत. ही महामारी की भयानक आहे की ज्यामध्ये आपले आप्त नातेवाईक अत्यंत जवळचे लोक मृत्युमुखी पडत असताना आपण हताशपणे पाहत आहोत. किंबहुना मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आपल्या प्रथेप्रमाणे किंवा परंपरेप्रमाणे अंत्यविधी देखील करता येत नाही.
निसर्ग खूप प्रेमळ आहे. निसर्गाने मानवी जमातीस खूप गोष्टी भरभरून दिलेल्या आहेत. निसर्गाने साधन संपत्ती दिलेली आहे, अधिवास दिलेला आहे, जगण्यासाठी सुंदर वातावरण दिलेले आहे. मात्र असे असताना देखील आपण निसर्गाची हेळसांड करत गेलो आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय निसर्ग कोपला आहे. खरंच निसर्ग एवढा क्रूर झाला आहे का? तो इतका क्रूर का झाला? यावर ते आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अशा प्रकारचे दूर नियंत्रण सुरू करण्यात पूर्वी निसर्ग नेहमीच वेगवेगळ्या संधी देत असतो, वेगवेगळे संकेत देत असतो. परंतु आपण या संख्येत आकडे दुर्लक्ष करत असत असतो. आता तरी सावध होऊया, निसर्गाचे संकेत समजून घेऊया. या पृथ्वीचे, या धरेचे आणि संपूर्ण मानव जातीचे संवर्धन करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे विशेष प्रयत्न करूया, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करूया, निसर्गाने निर्माण केलेल्या व्यवस्था मूळ स्थितीत ठेवूया. त्यामध्ये मानवी हितासाठी अनपेक्षित बदल न करता त्या गोष्टी निसर्गानेच जशा निर्माण केलेल्या आहेत, त्याच पद्धतीने ठेवूया व त्याचे संवर्धन करूया. म्हणजे मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी मदत होईल.
प्रा. डॉ. विजय मारुती कुंभार,
सहाय्यक प्राध्यापक, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा.
मोबाईल- 9860176059
kumbharvmgmail.com
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |