09:05pm | Apr 18, 2021 |
सातारा : रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याला राज्य सरकारच जबाबदार आहे. देशात कोणत्याही मेडिकलमध्ये इंजेक्शन विक्रीला मनाई नाही. परंतु राज्यात हे इंजेक्शन दिले जात नाही. राज्याचे औषध निर्माण मंत्री शिंदे यांनी औषध कंपन्यांना खंडणीची मागणी केली आहे. त्यांच्यामुळेच राज्यावर ही आफत आली आहे. मृत्यूच्या खाईत ठाकरे सरकारने लोटले आहे. एका इंजेक्शन कंपनीच्या मालकाला उचलता, हे सरकार हे राज्य तुमच्या बापाची जहागिरी आहे काय, असा सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.
सातार्यातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. यावेळी रयत क्रांती संघटनेचे शंकर शिंदे, मधुकर जाधव, प्रकाश साबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खोत म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यूचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा मृत्यूदर रेमडेसीवर हे इंजेक्शन नसल्यामुळेच वाढला आहे. या मृत्यूदराला जबाबदार हे ठाकरे सरकार आहे. कारण रेमडेसीवर या इंजेक्शनचा वेगवेगळ्या राज्यांनी औषधाचा मोठ्या प्रमाणावर साठा केला आहे, औषधांची खरेदी केली आहे. त्यामध्ये दिल्ली असेल मध्यप्रदेश असेल गुजरात असेल कर्नाटक असेल परंतु महाराष्ट्र सरकारने मात्र फक्त दुसरी लाट येणार आहे, एवढाच डांगोरा पिटला. दुसरी लाट थोपवण्यासाठी अगोदरच काही पाऊले उचलायला पाहिजे होती, डिपीडीसीच्या माध्यमातून व्हेंटीलेटर खरेदी करायला पाहिजे होती, प्रत्येक जिल्ह्यासाठी ऑक्सिजन प्लॅन्ट उभे करायला पाहिजे होते. त्याचबरोबर सरकारी दवाखान्यांमध्ये स्टाफची भरती पुरेशा प्रमाणात केली गेली पाहिजे होती. परंतु या प्रकारचे कोणतेही काम राज्यसरकारने केलेले नाही. डिपीडिसीतील पैसा आपल्या पक्षाचे आमदार, आपले कार्यकर्ते आणि मंत्री, पालकमंत्री यांनी आपाआपल्या मतदार संघात वाटून खाल्ला. आज रस्ते करायची जरूरी नव्हती. आज मतदार संघातील पुल बांधायची गरज नव्हती. आज माणसं वाचवण्याची गरज होती. ग्रामीण विकास खात्यातंर्गत 25-15 अंतर्गत प्रत्येक आमदाराला वीस वीस कोटी रुपयांचा फंड हा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या आमदारांना दिला गेला. हेच पैसे जिल्ह्यातील आरोग्याला दिले असते तर निश्चितपणाने मोठ्या सुविधा उभ्या राहिल्या असत्या, असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, रेमडेसीवीर इंजेक्शनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे, ते उपलब्ध आहे. परंतु इंजेक्शनबाबत औषध निर्माण खात्याच्या माध्यमातून राज्य सरकारने अशी भूमिका घेतली की आम्हीच खरेदी करणार. कोणत्याही कपंनीने राज्यातील मेडिकल दुकानदारांना हे इंजेक्शन देवू नये. जर कंपनीने मेडिकल दुकानदारांना दिली तर आम्ही त्या कंपनीवर कारवाई करु, अशी भूमिका घेतली. एका बाजूला काही कंपन्याबरोबर करारसुद्धा केला. तो करार करत असताना हे इंजेक्शन आम्हाला तुम्ही साडे सहाशे रुपयांनाच द्या. ह्या कंपन्या साडेबाराशेच्या खाली यायला तयार नव्हत्या. सरकारला हे इंजेक्शन साडे सहाशेला मिळत नव्हते, तर प्रायव्हेट दुकानदारांना जे मेडिकल दुकानामध्ये काम करतात, अशा लोकांना त्या-त्या कंपनीत खरेदी करायला तुम्ही का परवानगी दिली नाही.
ज्यांचा जीव जात आहे ती माणसे रेमडेसीवीरसाठी आज वणवण भटकत आहेत. त्यांनी ती दुकानातून खरेदी करुन घेतली असती. तुम्ही आणलेली स्वस्त दरातील इंजेक्शनसुद्धा लोकांनी घेतली असती. पण एकतर तुम्ही खरेदी केली नाही, मेडिकल दुकानदारांना खरेदी करुन दिली नाही. याचे कारण स्पष्ट आहे. औषध निर्माण मंत्र्याला यातून खंडणी गोळा करायची होती. कारण देशामध्ये कुठेही मेडिकल दुकानदारांनी रेमडेसीवीर खरेदी करु नये, असा आदेश नाही. हा आदेश महाराष्ट्रात निघतोच कसा. म्हणून रेमडेसीवीर इंजेक्शन ज्यांच्याकडे आहेत. त्यांनी दाबून ठेवलेली आहेत. राज्य सरकार त्या कंपन्यांवर दबाव टाकत आहे. प्रॉडक्शन खरेदी करायला तयार आहे पण आमचं कमिशन ठरवा, असा फतवा काढण्यात आला. राज्य सरकारच्या औषध निर्माण विभागाचे कमिशन न ठरल्यामुळे किंवा त्यांची खंडणी न मिळाल्यामुळे या राज्यातील जनता मृत्यूच्या दाढेत ढकलून दिलेली आहे.
जनता रेमडेसीवीर मिळावे म्हणून जीवाच्या आकांताने सैरभैर झालेली आहे. अशावेळी त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा आरोग्य खात्याला दबावाखाली ठेवून फुड ऍण्ड ड्रगच्या अधिकार्यांना हाताखाली घेवून रेमडेसीवीरचा साठा केलेला आहे. राज्यात पालकमंत्र्यांच्या आदेशाने त्यांचा कार्यकर्ता, जवळचा माणूस जर सिरीयस असेल तर त्याला तातडीने रेमडेसीवर उपलब्ध करुन देते. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या तेरा कोटी जनतेचे लोकप्रतिनिधी आहात, की मतदार संघातल्या कार्यकर्त्याचे लोकप्रतिनिधी आहात हे ठाकरे सरकारने जनतेला सांगावे. नुसते मास्क लावा, सोशल डिस्टन्स ठेवा, घरात बसा आणि मेलं तर मसणवाट्यात जाळून टाका, हा धंदा आता बंद करा. जनता उद्रेक करेल म्हणून मंगळवारी रयत क्रांती संघटना महायुतीतल्या पक्षांशी चर्चा करुन गावा-गावांत या खंडणीखोर ठाकरे सरकारचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात हातात घेणार आहोत, असा इशारा खोत यांनी यावेळी दिला.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |