04:12pm | Apr 07, 2021 |
(प्रकाश राजेघाटगे)
बुध: थोडी शेती तिही कोरडवाहू...आधार फक्त पावसाचा नापिकी तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीसाठी पुरेसे पाणी नाही. किंबहुना पाण्याची कसलीच सोय नसताना खटाव तालुक्यातील बुध गावातील राजुल रामचंद्र बोराटे यांनी शेतात एक वेगळा प्रयोग केला. खटाव-माण तालुका खास करून दुष्काळासाठी ओळखला जातो. या भागात पाणी आणि पाऊस कमी. अशा नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतीमधून पाण्याअभावी उत्पन्न घेणे म्हणजे हास्यास्पद. त्यावर मात करून बोराटे यांनी 14 गुठयांत शेवग्याच्या बियाणापासून पावनेतीन लाखाचे उत्पन्न मिळविले.
बोराटे यांनी खूप विचार करून व वेगवेगळ्या ठिकाणी शेत भेठी देऊन अभ्यास करून शेवगा हे कमी पाण्यावर येणारे पिक घ्यायचे ठरविले. जून 2017 ला आपल्या 14 गुंठे शेतामध्ये शेवग्याची रोपे लावून एक वेगळी वाट चोखळली. जूनमध्ये शेवगा लागवड केली खरी पण परिसरातील मित्रमंडळी शेजार्यांनी अक्षरशा टिंगल केली. अरे! तुमच्याकडे पाणी नाही आणि शेवगा जगणार कां? काहींच्यासाठी बोराटे यांची शेवगा शेती चर्चेचा व चष्ठेचा विषय बनला. लोक हा निव्वळ वेडपट पणा आहे असे समजु लागले. पण जून ते ऑक्टोबर पर्यंत लावलेल्या शेवग्याच्या रोपट्यांनी पावसाच्या आधारावर चांगला आकार व उंची घेतली. झाडे तीन्- चार फुट वाढली पण गंमत पुढेच होती. पाऊस बंद झाला आणि परिसरातील लोकांनी चेष्टा करण्यासाठी तोंडे उघडली. पण त्यांच्याकडे लक्ष न देता झाडे जगविणे महत्त्वाचे होते. शेजारी कोणी पाणी विकतही दयायला तयार नव्हते. उन्हाची तीव्रता वाढली होती. मग उपाय म्हणून पाणी पिण्याच्या बिसलरीच्या बॉटल जमा केल्या. त्याच्या झाकणाला छिद्ग पाडून त्यामध्ये सुतळी ओवून ती आर्धी बाटली मध्यं व आर्धा -बाहेर ठेवून त्यात पाणी भरून बाटल्यातून सुतळीच्या आधारे झाडाच्या बुद्याजवळ सलाईन सारखे पाणी सोडले. सुतळीतून पाझरणारे पाणी किमान तीन दिवस बुध्या जवळ पाझरत असते. पुढ उन्हामध्यं पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी खोडा भोवती गव्हाचे भुस्कट व शेतातील चगळ- चोथा याचे आच्छादन दिल्यामुळे पाण्याचे चांगले संरक्षण झाले.
झाडांची छानपैकी वाढ झाली. चार माहिन्यानंतर पहिला फुलांचा बहार आला. कमी पाणी असतानाही झाडाला शेंगा लागल्या व सुरूवातीला स्थानिक बाजारपेठेत वीस ते पस्तीस रुपये पर्यंत किलोस भाव मिळाला. 14 गुंठ्यातून कधीतरी हजार बाराशे रूपयेचे उपन्न मिळायचे तेथे अत्यंत कमी पाण्यात लावलेल्या शेवग्यातून पहिल्या वर्षी सर्व खर्च जाऊन 35 हजार रुपये मिळाले. दुसर्या वर्षांसाठी मेच्या पहिल्या आठवडयात शेवग्याची दिड फुटावर छाटणी केली. योग्य नियोजन करून फुटवे घेतले. पुढे जानेवारी, फेबुवारीमध्ये शेवग्याचा दुसरा बहार घेतला. यावेळी झाडे वर्षाची व पंधरा फुटांपर्यंत मोठी झाली होती. विस्तार वाढला होता. शेंगाचे प्रमाण परिल्यापेक्षा चौपट होते.
यावेळी वेगळा प्रयोग म्हणून बाजारात हिरव्या शेंगा विकण्याबरोबरचं शेवगा बियाणे तयार करून विक्रीसाठी तयार केलं. मोबाईल व युट्युबच्या माध्यमातून त्याची जाहिरात केली. गेल्या वर्षी मे माहिन्यात बियाणा विक्रीतून 42 हजार रूपये व शेवगा शेंग विक्रीतून सर्वसाधारण 40 हजार रुपये उपन्न मिळाले. स्वतंत्र पाण्याची कसलीही सोय नसताना पावसाच्या भरवशावर व काही वेळा दुसर्याच्या विहीरीचे डोक्यावर पाणी आणून आपल्या कुटुंबाच्या मदतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेवगा शेती यशस्वी करून दाखविली आहे. गेली चार वर्षे ते शेवगा बियाणे निर्मिती करत आहेत. अत्यंत रुचकर, आकर्षक रंगाचा व माफक साईजचा शेवगा रोहित 1 हा वाण त्यांच्याकडे असून त्याची फक्त बियाणे निर्मिती ते करतात. त्यामुळे त्यांच्या फक्त 14 गुंठे क्षेत्रातून भारतभर त्यांनी ऑनलाईन बियाणे विक्री करून प्रति बियाणे ‘चार रूपये’ प्रमाणे 69000 बियाण्यांची विक्री करून पावनेतीन लाख रूपयांची विक्रमी उत्पन्न घेतले.
आतापर्यंत ज्या शेतीला पाण्याची गैरसोय होती. त्यास यावर्षी पाण्याची सोय केल्यामुळे त्यांची पपईसाठीची अडचण दूर झाली. मात्र हा शेवगा सध्या फक्त बियाणे निर्मितीसाठी आहे. बीजप्रक्रियासाठी लागणारी औषधे फवारणीमुळे ही शेंग खाण्यासाठी अपायकारक आहे. शेवगा बियाणे विक्रीबरोबरच शेवगा शेतीसाठी शेतकर्यांना विविध ठिकाणी शेत भेट देऊन मार्गदर्शनही करतात. भारतातील प्रत्येक राज्यात ऑनलाईन पध्दतीने विक्री केल्यामुळे बियाणे पोहचले आहे. या वर्षाही अॅडव्हान्स बुकिंग असल्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल अशी शाश्वती आहे. थोडी समय सुचकता व कष्टाची जोड व मागणीचा विचार केला तर अडचणीतली शेतीही यशस्वी होऊ शकते. आपल्या दुष्काळी पट्ट्यातील व कोरडवाहू व कमी पाणी असणार्या शेतकर्यानीही वेगळा व हमखास उपन्न देऊन जाणारा प्रयोग म्हणून शेवगा शेतीकडे पाहण्यास हरकत नाही. पारंपारिक शेतीला फाटा देऊन धोडी चिकाटी आणि कष्ट केले तर कमी पाण्यात ही आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |