12:57pm | Aug 03, 2022 |
दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. नोटाबंदीपासून ते कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपर्यंत आणि देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबाबतही त्यांनी आपली भूमिका वारंवार मांडली आहे. मोदी सरकारला खडे बोल सुनावण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. आताही त्यांनी 'मोदी सरकार त्यांची स्तुती करणाऱ्यांनाच बरोबर मानते, बाकी सगळे चुकीचे', असे विधान केले आहे.
रघुराम राजन म्हणाले की, जगातील इतर अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये हिंदुस्थानची अर्थव्यवस्था मजबूत आहे, परंतु रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने पुढील 10 वर्षात संकटांचा सामना करावा लागू शकतो. ज्या पद्धतीने महागाई वाढतेय ते पाहता संकट अधिक गडद होऊ शकते. त्यामुळे आपण विश्रांती घेऊ शकत नाही, आपल्याला अजून खुप काही करायचं आहे. परंतु मोदी सरकार त्यांची स्तुती करणाऱ्यांनाच बरोबर मानते, बाकी सगळे चुकीचे, असेही राजन म्हणाले. 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटाचा सामना करत आहे. हिंदुस्थान एक गरीब देश आहे. वर्षानुवर्षे ज्या प्रकारे नोकऱ्यांची गरज वाढली आहे त्यासाठी विकासातील वाढ अपुरी आहे. त्यामुळे लोकांनी आपले स्किल वाढवण्यावर भर द्यावी आणि शिक्षण क्षेत्रामध्येही तेजी आणावी, असेही रघुराम राजन यावेळी म्हणाले.
लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. परंतु गेल्या काही वर्षात सरकारने नोटाबंदी, तीन कृषी कायदे यासारखे अनेक निर्णय व्यापक सल्लामसलत न करता घेतले. ज्यामुळे सरकारला जनक्षोभाचा आणि निषेधाचाही सामना करावा लागला. लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा असून संवाद हे न संपणारे चक्र असून ते चालूच राहिले पाहिजे, असेही राजन म्हणाले.
दरम्यान, मोदी सरकारवर निशाणा साधण्याची रघुराम राजन यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेक मुद्द्यावरून मोदी सरकारला घेतले होते. गुजरातमध्ये मागे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा उभारण्यात आला त्यावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. सरकारने राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी आधुनिक शाळा आणि विद्यापीठं उभी केली पाहिजेत, असे मत त्यांनी मांडले होते.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |