07:12pm | Jan 22, 2021 |
सातारा : वीज बिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा महावितरणने दिल्यानंतर सर्वच विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणार्या वीज ग्राहकांकडून अशी वसूली करण्याचा निर्णय घेणे म्हणजे खासगी सावकारीचा प्रकार असून मुख्यमंत्र्यांनी खासगी सावकाराच्या भूमिकेतून बाहेर पडावे, अशी टिका आपचे सरदार सागर भोगावकर यांनी केली आहे. तसेच राज्य शासनाने वीज बिल प्रश्न दिलासा न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिध्दपत्रकात म्हटले आहे की, कोरोना संकटकाळाने जवळपास वर्षभर सर्वसामान्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. घरगुती आणि लघु उद्योजक ग्राहकांना या लॉकडाउन चा फटका बसला असल्याने त्यांची वीज बिल थकबाकी आहे. त्यांच्या खिशात पैसे नसताना त्याची वीज कापणे म्हणजे सावकारीच आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभ्यास करूनच 30 टक्के वीज सवलतीचे आश्वासन वचननाम्या द्वारे राज्यातील जनतेला दिले होते. मग आता शब्द न पाळता कनेक्शन कट करण्याची धमकी, यामागे कुणाचा दबाव आहे हे त्यांनी जनतेस सांगावे. चुकीच्या पध्दतीने वीजबिले पाठवून जनतेची लूट करण्याचा हा प्रकार संतापजनक आहे. उर्जामंत्री यांनी तर याबाबत आत्तापर्यंत तीन वेळा वेगवेगळी विधाने केली आहेत.
दिल्लीत आप सरकार गेले काही वर्षे 200 युनिट वीज मोफत देते आहे. महाराष्ट्रात सरकारची भूमिका अडेलपणाची आहे. खरेतर सार्वजनिक दिवाबत्ती-पाणीपुरवठा व इतर शासकीय सेवांची वीजबिल थकबाकी मोठी आहे. तसेच उच्चदाब व बेकायदेशीर वीज वापराचा/ गळतीचा बोजा पण मोठा आहे. ती रक्कम वसूल न करता सामान्य ग्राहकांच्या अंगावर तो बोजा टाकणे अयोग्य आहे.
वीज बिल प्रश्न दिलासा देण्यासाठी राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा दावा करणार्या महाराष्ट्र सरकारने मद्यविक्री परवाना शुल्कात 360 कोटींची सवलत दिली आहे, एकूणच राज्य सरकारच्या या कारभाराला कंटाळूनच ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला झटका दिला आहे. परंतू आपल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावत आपल्यालाच जनतेने बहुमत दिल्याचे सांगत आहेत. ग्रामपंचायत निवडणूकांत जनादेश मिळाला नाही म्हणून राज्य सरकारने सक्तीची विजबिल वसुली मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोपही त्यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
सरकारने वीजबिल वसुली प्रकरणी अवलंबलेले चुकीचे धोरण बदलले नाही तर जनतेच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागेल. आपतर्फे या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |