01:15pm | Sep 23, 2021 |
पुसेगाव : काटकरवाडी (ता. खटाव) हद्दीतील येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या सत्तर लोखंडी फळ्या चोरीला गेल्याची घटना रविवारी घडली. त्यामुळे पुसेगाव-काटकरवाडी परिसरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुसेगाव ते वाकेश्वरपर्यंत सर्वच बंधाऱ्यांची दुरवस्था झाल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढणार आहे.
या ठिकाणच्या बंधाऱ्याला लोखंडी फळ्या टाकून दरवाजे बंद करावे लागतात. मात्र, बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला गेल्याने नदीपात्रातील पाणी न अडता वाहून जात आहे. परिणामी परिसरात एवढा मोठा बंधारा असूनसुद्धा पाणी साठणार नसल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे.
दरम्यान, या बंधाऱ्याच्या फळ्या टाकल्यानंतर जवळपास एक किलोमीटरच्या नदीपात्रात पाण्याचा साठा होतो. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या पाण्याची सोय होते. मात्र, या पाणी साठ्यामुळे वाळू तस्करीवर अंकुश येतो. त्यामुळे या चोरीशी परिसरातील वाळू तस्करांचा संबंध असल्याचे काटकरवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला गेल्याने परिसरातील शेतीसोबतच नैसर्गिक साधनसंपत्तीचे देखील नुकसान होत आहे. तरीदेखील संबंधित विभाग या बाबींकडे कानाडोळा करत असल्याचे लाभधारक सांगत आहेत. त्यामुळे बंधारा वाहून गेल्यावरच देखभाल, दुरुस्ती होणार का? असा प्रश्न येथील ग्रामस्थ विचारत आहेत.
पुसेगाव पासून वाकेश्वर पर्यंतच्या बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. काही दिवसांत जिहे-कठापुर योजनेचे पाणी नेर तलावात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांची देखभाल, दुरुस्ती झाली तरच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.
दहा वर्षांपूर्वी येरळा नदीवर झालेला काटकरवाडी हद्दीतील हा बंधारा निरूपयोगी झाला असून त्याची वेळेवर देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तरच त्याचा उपयोग होईल, नाहीतर बंधारा फक्त नावापुरता उरेल.
- ज्ञानेश्वर काटकर, ग्रामस्थ काटकरवाडी.
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |