09:27pm | Dec 03, 2021 |
सातारा : गेली दोन वर्षे कोरोना संकटाचा मोठ्या निकराने सामना करण्यात यश आले. मात्र आता नव्याने आलेल्या "ओमायक्रॉन'च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे. विविध देशातून सातारा जिल्ह्यात आलेल्या 13 नागरिकांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असून नागरिकांनी घाबरु न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
गेल्या दोन वर्षापासून सातारा जिल्हा प्रशासनाने कोरोना संकटाचा मोठ्या धीराने सामना केला आहे. या संकटात प्रशासनाला अनेक सामाजिक संघटनांनीपण मदत केली. अपुरे मनुष्यबळ, सुविधांचा अभाव असतानाही कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. जिल्हावासियांनीही प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य केल्याने हे साध्य झाले आहे. सातारा जिल्ह्याने कोरोना लसीकरणात राज्यात चांगले काम केले आहे. परिणामी नागरिकांची भिती कमी झाली आहे. सध्य परिस्थितीत कोरोना पूर्णत: नियंत्रणात येत असतानाच "ओमायक्रॉन' हे नवे संकट आले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत नियमावली जारी केली असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे गौडा यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत "ओमायक्रॉन' बाधित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली असली तरी अद्याप सातारा जिल्ह्यात कुठेही संशयित आढळून आलेला नाही. परदेशातून आलेल्या 13 नागरिकांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असून आरोग्य विभाग याबाबत आणखी सतर्क झाला आहे. प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन गौडा यांनी केले आहे.
कोरोनाची भिती कमी करण्यासाठी कोरोना लसीकरण जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात येत असून लसीकरणात जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्हा परिषदेने कोरोना आणि ओमायक्रॉन बाबत सतर्कता बाळगली आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये प्रवेश देण्यात येत असून मास्क, सॅनेटायझर, सोशल डिस्टन्सिंगबाबत दक्षता घेण्यात येत आहे. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल अशा कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याबाबतचा निर्णय प्रसंगी घेण्यात येणार आहे.
-विनय गौडा (मुख्य कार्यकारी अधिकारी)
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |