03:26pm | May 26, 2022 |
मुंबई : "शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि मी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, विजय आमचाच होणार", असा विश्वास व्यक्त करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला ललकारलं. शिवसेनेच्या उमेदवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, त्यामुळे विजय निश्चित असल्याचं राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरचे निष्ठावंत शिवसैनिक संजय पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. दुपारी २ वाजताच्या दरम्यान त्यांनी विधानभवनात अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सेनेचे सगळे मंत्री, मविआचे प्रमुख नेते उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले, "मी आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करतेवेळी मुख्यमंत्री, पवारसाहेब, बाळासाहेब थोरात, विविध मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते. मी खात्रीने सांगतो यावेळी सेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेत जातील. कारण शिवसेनेच्या उमेदवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. राज्यसभेच्या सहा जागांपैकी आमच्या मविआचे ४ उमेदवार नक्कीच विजयी होतील. याबद्दल माझ्या मनात शंका नाही"
"राष्ट्रवादीचे प्रफुल्ल भाई पटेल हे उमेदवार असतील तसेच माझ्या माहितीप्रमाणे ते ३१ तारखेला अर्ज भरतील. तसेच परंपरेप्रमाणे काँग्रेस आपला उमेदवार निश्चित करुन त्याचं नाव जाहीर करेल आणि त्यानंतर अर्ज भरेल", असं संजय राऊत यांनी सांगितलं.
मंत्री अनिल परब यांच्यावरील ईडीच्या कारवाईबद्दल राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर या कारवाया सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा कारवाया करुन निवडणुका जिंकू असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी नक्की कारवाया कराव्यात. सध्याचा काळही एक दिवस निघून जाईल नंतर सूत्रे आमच्या हातात येतील, असा सूचक इशाराही त्यांनी भाजपला दिला.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |