सातारा : शेतकर्यांचे प्रश्न प्रशासनाने सोडवावेत, या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून काढण्यात आलेली रयत क्रांती संघटनेची वारी शेतकर्यांची गुरुवारी सातार्यात पोहचली. दरम्यान जोपर्यंत सरकारमधील मंत्री शेतकर्यांच्या प्रश्नांची दखल घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने देत पुणे-बेंगलोर महामार्गावर ठिय्या मांडला. यामुळे महामार्गावरील सातारा-पुणे मार्गाची वाहतूक खोळंबली.
शेतकर्यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने 22 मे पासून कराड ते सातारा या दरम्यान वारी शेतकर्यांची ही पदयात्रा काढण्यात आली आहे. आमच्या मागण्यांवर आणि प्रश्नांवर राज्य शासनाने निर्णय न घेतल्यास ही वारी मुंबई पर्यंत काढणार, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला होता. गुरुवारी खोत यांची यात्रा सातार्या नजीक आल्यानंतर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातच शेतकर्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि खोत यांच्यासह रस्त्यावरच बसकण मारली. यामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतूक खोळंबली.
या वारीसाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्रमध्ये ऊसाला चार हजार रुपये भाव मिळतो. तो गुजरात पॅटर्न महाराष्ट्राला लागू करावा, दोन कारखान्यांमधील 25 किलोमीटरचे हवाई अंतर कमी करावे, तुकडे बंदी कायदा रद्द करावा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या शेतकर्यांनी भर उन्हात फलक झळकावित लक्ष वेधले. राज्य शासनाने या मागण्यासंदर्भात जर सकारात्मकता दर्शवली नाही तर सातार्यातून 500 वाहनांमधून ही यात्रा थेट मुंबईला मंत्रालयावर नेऊ, असा इशारा खोत यांनी दिला आहे. दीड तासाच्या या महामार्गावरील गोंधळ नाट्य नंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली सदाभाऊ खोत यांनी शेतकर्यांच्या वारीसाठी आणि त्यांच्या मागण्यासाठी वाटेल ते आंदोलन करण्याचा राज्य शासनालाही इशारा दिला आहे.
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |