01:12pm | Oct 20, 2020 |
सातारा : मालदेव, ता. सातारा येथे वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे यासाठी वन विभागाच्या माध्यमातून ३५ लाख रुपये खर्चाच्या तीन तारेच्या कुपंणाना विभागाच्या माध्यमातून मंजुरी मिळाली होती. त्यापैकी दोन कामे पूर्ण झाले असून ८०० मीटर लांबीच्या तारेच्या कुंपणाचे काम प्रलंबित असतानाच ते कुंपण अन्य ठिकाणी हलवण्याचा घाट क्षेत्रपाल योगेश गावित यांनी घातला आहे. तसे झाल्यास वन्यप्राण्यांचा शेतीला मोठ्या प्रमाणावर उपद्रव होऊ शकतो. पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी निश्चित केलेल्या ठिकाणी तारेचे कुंपण करण्यात यावे अन्यथा आम्ही काम बंद पाडू, असा इशारा शेतकर्यांच्यावतीने ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीने एका निवेदनाद्वारे उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांना दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की मालदेव, ता. सातारा हा भाग दुर्गम आणि जंगलाने वेढलेला असल्यामुळे याठिकाणी वन्य प्राणी उदा. रानगवे, डुक्कर, अस्वल आदींचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. येथील नागरिक शेतीवर आपली उपजीविका करतात. गेल्या काही वर्षांपासून त्या ठिकाणी शेतीला वन्यप्राण्यांचा मोठा उपद्रव होत आहे. अनेकदा वन्यप्राण्यांमुळे हातची पिके गेली आहेत. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतर पंचनामा करून प्रत्यक्ष नुकसान भरपाई देण्यासाठी प्रदीर्घ कालावधी जात असतो. त्यामुळे मालदेव येथील शेतकर्यांनी वन विभागाकडे शेतीला तारेचे कुंपण घालण्याची मागणी केली होती. सन २०१९-२० साली ही मागणी मान्यही करण्यात आली आहे. शासनाकडून तारेच्या तीन कुंपणासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी दोन तारेच्या कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे.
८०० मिटर कुंपणाचे काम अद्याप बाकी असताना सातारा तालुक्याच्या क्षेत्रपाल योगेश गावित यांनी ८०० मिटर कुंपन शेतीला न घालता प्लांटेशनला (वृक्ष लागवडीची नर्सरी) घालण्याची नवीन भूमिका घेतली आहे. तसे झाल्यास शेतीचे फार मोठे नुकसान होणार असून शेतकर्यांवर अन्नाशिवाय उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने तारेचे कुंपण मंजूर केल्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या कुपणांमुळे वन्यप्राण्यांना अटकाव होऊन शेतकर्यांना शाश्वत शेती करण्याची संधी उपलब्ध झाली होती. मात्र योगेश गावित यांनी घेतलेल्या नवीन भूमिकेमुळे शेतकर्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारचा निर्णय घेताना संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव घेण्यात आलेला नाही. तसेच शेतकर्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आली नसल्यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ८०० मीटर तारेचे कुंपण निश्चित झालेल्या ठिकाणीच म्हणजेच शेतीलाच घालण्यात यावे, ते प्लांटेशनला घालण्याचा घाट घातला गेल्यास शेतकर्यांनी ते काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला पूर्णपणे वनविभाग जबाबदार राहील.
संबंधित क्षेत्रपाल योगेश गावित यांना ८०० मीटर तारेचे कुंपण शेतीलाच घालण्याच्या सूचना आपण कराव्यात. निवेदनावर ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरआप्पा चव्हाण, सदस्य जयराम चव्हाण, महादेव लोहार यांच्या स्वाक्षरी आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |