03:37pm | Jun 04, 2020 |
इस्लामाबाद: कोरोना संकटकाळात टोळधाडीच्या समस्येने पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. टोळांच्या या हल्ल्याने शेतकरी चिंतेत असताना पाकिस्तान सरकारने त्यातून कमावण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. या टोळांना पकडून कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापरण्याची पाकिस्तान सरकारची योजना आहे. त्यासाठी टोळ किड्यांना पकडण्याचं आवाहन पाकिस्तान सरकारने केले आहे.
या टोळांच्या हल्ल्याने पाकिस्तानला मोठे नुकसान झाले आहे. याखेरीज या हल्ल्यांमुळे पूर्व आफ्रिका आणि दक्षिण आशियाच्या बर्याच देशांमध्ये हजारो हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली आहेत. टोळांची धाड यापुढे इराण आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांवर हल्ला करेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. वाळवंटातील टोळ हे समूहात असताना त्यांचे वर्तन बदलतात. टोळ एका तासामध्ये 16 ते 19 किमी अंतर अंतर करू शकतात. वार्यामुळे ते आणखी दूर जाऊ शकतात. एक किलोमीटर टोळाच्या समुहात सुमारे 4 कोटी टोळ असतात. एका दिवसात 35 हजार लोक जेवतील इतकी ते पिक खातात.
पंतप्रधान इमरान खान म्हणाले की, टोळ पकडण्यासाठी देशव्यापी पायलट प्रकल्प तयार करणार आहोत, यात टोळांना पकडून देणार्या शेतकर्यांना पैसे दिले जातील. या योजनेमुळे देशातील काही गरीब भागातील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल असा दावा करत पकडलेल्या टोळांपासून पॉल्टी फार्मसाठी प्रथिनेयुक्त चारा बनवला जाईल असं त्यांनी सांगितले आहे.
पाकिस्तानचे मंत्री शिबली फराज यांनी सांगितले की, नागरिकांवर अन्नधान्याचं संकट असल्यामुळे टोळांना पकडून विकण्याची योजना आणली आहे. हा पायलट प्रोजेक्ट पंजाब प्रांतातील ओकरा येथे लागू करणार आहे. शेतकर्यांना त्यासाठी 20 रुपये किलो या भावाने पैसे दिले जाणार आहेत.
ओमानच्या वाळवंटात जोरदार पाऊस पडल्यानंतर टोळ तयार होतात. हिंद महासागराच्या चक्रीवादळामुळे वाळवंटातही पाऊस पडला आहे, त्यामुळे टोळ देखील तयार झाले आहेत. एप्रिल महिन्यात भारतात राजस्थानमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पसरले आहेत.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |