01:07pm | Aug 01, 2020 |
काठमांडू: बहिष्कार अस्त्राने हैराण झालेल्या चीनने आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. कोरोना संकटाच्या आडून भारताविरोधात आघाडी उभी करण्याची चीनची नवी चाल अयशस्वी झाल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. करोनाच्या संकटाशी दोन हात करण्याच्या मुद्यावर भारताच्या शेजारच्या देशांना आपल्याकडे वळवून भारतावर दबाव टाकण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. या बैठकीच्या दोन दिवसानंतर नेपाळने आपण गटनिरपेक्ष असल्याचे जाहीर केल्याने चीनला धक्का बसला आहे.
नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञवली यांनी चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळ या चार देशांच्या गटाबाबतचा विचार धुडकावून लावला. चीनसह झालेली बैठक ही करोना संसर्गाच्या मुद्यावर होती. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली. नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे देश ‘सार्क’चे सदस्य आहेत. तर, चीन निरीक्षक आहे. त्यामुळे इतर नवीन गट बनवण्याचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. नेपाळ हा गटनिरपेक्ष असून कोणत्याही देशाच्या गटात जाणार नसल्याचे संकेत दिले.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतावर नाराजी व्यक्त करताना टीका केली. करोना संसर्गाच्या काळात भारत हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीनसह इतर देशांसोबत चर्चा करत आहे. मात्र, नेपाळसोबत एकदाही चर्चा केली नसल्याचे त्यांनी म्हटले. त्याशिवाय भारताने नोव्हेंबर 2019 मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या राजकीय नकाशातील आठव्या आवृत्तीत नेपाळच्या हद्दीतील कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरी हा भाग भारताचा भूभाग म्हणून दाखवला. भारताने चर्चा नाकारल्यामुळे आम्हाला नवीन नकाशा प्रकाशित करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. भारतासोबत आम्ही चर्चा करण्यासाठी काही तारखाही कळवल्या. मात्र, भारताने आमच्या प्रस्तावावर काहीच उत्तर दिले नसल्याचेही नेपाळने म्हटले.
नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञावली यांनी सांगितले की, भारत आणि चीन यांच्यातील संबंधाचा परिणाम आशियावर पडणार आहे. वुहान शिखर परिषदेनंतर भारत-चीनमधील संबंध चांगले होते. मात्र, गलवानमधील घुसखोरीनंतर संबंध बिघडले असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देश तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करत असून मतभेद कशाप्रकारे दूर करतात, हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |