04:45pm | Aug 13, 2020 |
अजित जगताप
सातारा: कोरोना संसर्ग महामारीमुळे सर्व संदर्भ बदलेले आहेत. तशा पध्दतीने रूढी पंपराही बदलण्यासाठी उर्त्स्फूतपणे लोक पुढाकार घेत आहेत. सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपले विवाहाचे स्वप्न पूर्ण केले असले तरी शासकीय नियमांचे पालन करताना साध्या विवाहाने सुमारे दीड कोटी रूपयांची बचत झाल्याचे मानण्यात येवू लागले आहे.
पूर्वी विवाह म्हणजे स्वर्गात बांधलेल्या गाठी असतात. याची खात्री करण्यासाठी काही पालक हे पचांग, शुभमुहूर्त, पत्रिका पाहून निर्णय घेतात. तर काही जण विज्ञानवादावर विश्वास ठेवून लगीन घाई करतात. सातारा जिल्हयात कोरोना लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी नको म्हणून केंद्र वराज्य सरकारने धार्मिक, सामाजिक, राजकीय व वैवाहिक कार्यक्रमांना मर्यादा घातली होती. त्यामुळे बस्ता, सुपारी, शिलांगन, वरात, ग्रामदैवत आशीर्वाद, फटाक्यांची आतषबाजी, बँजो, घोडा, फेटे, मानपान, भोजनावळ, नातेवाईकांचा पोषाख, बुत्ती अशा पारंपारिक गोष्टींना फाटा दिल्याने अनेकांचा रोजगार उन्हाळ्यातच करपून गेला होता. तर पावसाळ्यात वाहून गेला. हे जरी खरे असले तरी वधू - वरांच्या पालकांची आर्थिक बचत मोठ्या प्रमाणात झाली आहे.
सध्या शेतीमालाला भाव नाही, उत्पन्न कमी आहे. सरकारी व खासगी नोकरीची शाश्वती नाही. सर्व गोष्टींची पूर्तता करताना कर्ज उचलावे लागते. वाढती महागाई, तसेच अलंकार, दाग - दागिणे, आणि सौदर्य प्रसाधने खरेदी करण्यामध्येच लाखभर रूपयांचा चुराडा होत होता. या गोष्टीला फाटा देवून आता सर्वधर्मिय नवरा-नवरी व त्यांचे पालक आता शॉर्टफिल्मसारखी मॅरेज करू लागले आहेत. बचत झालेल्या पैशातून नव्या उमेदीने संसार करणार्या पती-पत्नीला हातभार लागत असल्याने कोरोना संकट हे काहींसाठी सुवर्णसंधी ठरली आहे. पूर्वी दारात मंडप घालून जी लग्न होत होती. ते आयुष्यभर टिक होते. आता जुन ते सोनं म्हणून अनेक जण छोट्याशा जागेतच विवाह बंधनात अडकून पडत आहेत. ही परिवर्तनाची बाजू असून आता महिलांनासुध्दा याचे आप्रूप वाटत आहे.
श्रीमंतांच्या घरी गरीबांचा जाणारा पैसा हा पैसा गरीबांकडे गेला तर काही हरकत नाही परंतु व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून वावरणार्यांकडे हा पैसा हा आता थोपवण्यात आला आहे. अशी माहिती वधू-वर सूचक विवाह मंडळाचे सयाजीराव पाटील, भालचंद्र माळी, बाळासाहेब शिरसाट, शहाजी गुजर आदींनी दिली आहे. सध्या कोरोनामुळे कार्यालयाऐवजी घरातूनच लग्न ठरवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |