04:39pm | Aug 03, 2020 |
सांगली : प्रभू राम, लक्ष्मण, हनुमान ही पुरुष दैवतं आहेत. पण राम, लक्ष्मण यांची चित्रं काढताना, त्यांच्या मूर्ती साकारताना चित्रकार, शिल्पकारांनी चूक केली की काय असं माझ्या लक्षात येतं. त्यामुळे राम मंदिरात जी मूर्ती बसवली जाईल, ती मूर्ती मिशीवाली असावी. आतापर्यंत झालेली चूक आपण दुरुस्त करणार नसू, तर मंदिर होऊनही न झाल्यासारखंच आहे, असं मत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भिडे बोलत होते. यावेळी बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, अयोध्येच्या राम मंदिरात बसवण्यात येणारी प्रभू रामांच्या मूर्तीला मिशी असावी. तसेच राम मंदिराचा शिलान्यास करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात यावं, असंदेखील संभाजी भिडे यांनी म्हटलं. ’भारत नावाचं राष्ट्र शिवछत्रपतींमुळे अस्तित्वात आहे. त्यामुळे भूमिपूजनाला आपण त्यांची आठवण ठेवू. शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की, असं कवीभूषण यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राम मंदिराच्या पायाभरणीवेळी शिवप्रतिमेची पूजा अगत्यानं करावी, असं संभाजी भिडे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल केलेल्या विधानांवरही संभाजी भिडेंनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोन्हीही नेते सन्माननीय आहेत. पण ते गोंधळलेले आहेत, असं मत भिडे यांनी व्यक्त केलं. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण नसेल तरीही त्यांनी अयोध्येला जावे. असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे.
एसटी बंद करून, व्यवसाय बंद करून करोना जाणार आहे का,’ असा सवालही त्यांनी केला. ’पवार बोलले ते मला वाईट वाटले. त्यांना निमंत्रण नसले तरी त्यांनी आयोध्येत जावे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तेच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील,’ असंही भिडे म्हणाले. राम मंदिराचे पतन झाल्यानंतर सुमारे 500 वर्षांनी आयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न होत आहे. गाव, खेड्यात हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा. या सोहळ्यात आयोध्येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आगत्याने पूजन करावे, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |