09:39pm | Mar 17, 2021 |
फलटण : माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
आज दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी भेट घेतली. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी महाराष्ट्रातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत केले.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राहुल कुल, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परस्थितीची संपूर्ण माहिती गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घातली. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे, कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये संपूर्ण आढावा गृहमंत्री यांच्या कानावर घालण्यात आला.
महाराष्ट्रातील साखर उद्योगाबाबत खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी शिष्टमंडळाच्यावतीने संपूर्ण माहिती दिली. आज साखर कारखान्याची महाराष्ट्रातील परिस्थिती काय आहे, त्यावर येत असलेल्या अडचणींना राज्य सरकार करत नसलेले सहकार्य, आजारी साखर कारखान्यांना केंद्र शासनाने कशा पद्धतीने मदत केली पाहिजे व साखर धंदा हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्यास कशी मदत होईल, तसेच साखर उद्योग बरोबरच साखर उद्योगाशी निगडित असणारे इतर व्यवसाय इथेनॉल, को-जन याहीबाबत सरकारने काही भूमिका घेतल्या पाहिजेत, याचीही माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण माहिती घेऊन यावर लवकरच तोडगा काढला जाईल व या साखर उद्योगास बळकटी दिली जाईल, अशी ग्वाही या शिष्टमंडळाला दिली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |