09:01pm | Dec 02, 2021 |
सातारा : सातारा जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजनांच्या हक्कासाठी तयारीने उतरणार आहे. जिल्हयातील राष्ट्रीय पक्ष संलग्नित आघाडीशी युती अथवा स्वतंत्र पॅनेल, असे दोन्ही पर्याय रिपाई समोर उपलब्ध आहेत. सहा नगरपंचायतीच्या 102 जागांपैकी किमान 50 जागा ताकतीने लढविणार असल्याची माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रिपाई ए गटाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय राजकीय हालचाली असणार, या विषयावर जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला.
अशोक गायकवाड पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. याबाबतची घोषणा होऊन सहा दिवस झाले. याबाबत भाजप पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली, पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रिपाई ला सर्व पर्याय उपलब्ध आहेत. जो पक्ष आम्हाला न्याय देईल त्याबरोबर जाऊन निवडणूक लढवणार आहोत. येत्या आठ दिवसात पक्षीय आघाड्यांचे राजकीय चित्र स्पष्ट होईल. शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारसरणी दलितांच्या हक्कासाठी संघर्ष करणारी होती. या विचारधारेला प्राधान्य देणार्या पक्षीय आघाड्याशी युती करण्याचे संकेत गायकवाड यांनी दिले. ते पुढे म्हणाले, खंडाळा, लोणंद नगरपंचायतीत रिपाई पॅनल टाकण्याच्या विचारात आहे. शिरवळ येथे 6, तर वडूज येथे 4 अशा जागा लढवण्याची आमची तयारी आहे. कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांना मतदारांनी आम्हाला बळ द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
येथील दलित आज असुरक्षित आहे. साहिल रणदिवे याने जयभीम म्हटल्याने त्याला मारहाण केली हे योग्य नाही. आम्हाला शांत राहू द्या आम्हांला लढण्यास भाग पाडू नये. पोलिसांनीही यामध्ये न्याय देण्याची भूमिका घ्यावी, सातारा अशांत करू नये. गरिबाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका. जयभीम म्हणणे हा गुन्हा नाही. त्याचबरोबर दलितांवरील अत्याचार थांबवावेत. अन्यथा दलित पँथर ला स्वतंत्र भूमिका घ्यावी लागेल. भाजप, राष्ट्रवादी बरोबर युती झाली नाही तर प्रत्येक नगरपंचायतचा राजकीय अंदाज लक्षात घेऊन परिस्थिती सापेक्ष 10 ते 12 जागा लढवणार असल्याचे सूतोवाच गायकवाड यांनी केले. कोरोना महामारीमुळे दोन वर्षात महापरिनिर्वाण दिन करता आला नाही. यावर्षी ओमयक्रोन हा नवा म्युटंट आला तर आम्ही देशसेवा सुरक्षिततेसाठी पुढाकार घेऊ. आणि नाही आला तर सर्वजण एकत्रपणे महापरिनिर्वाण दिन साजरा करू, असेही ते म्हणाले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |