11:38pm | Oct 23, 2020 |
सातारा : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कधीही भरून न येण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जाण्याची गरज आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी भाजप महाविकास आघाडीला भाग पाडेल, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
आज विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सातारा तालुक्यातील सोनवडी, गजवडी, कारी याठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, तहसिलदार सौ. आशा होळकर, कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे, जिल्हा प्रभारी भाजप सदाशिव खाडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, शहर अध्यक्ष विकास गोसावी, किसान मोर्चा सातारा तालुकाध्यक्ष हेमंत शिंदे, राजूभैया भोसले, गणेश पालखे, सुनिल जाधव जिल्हा चिटणीस राहूल शिवनामे जिल्हा उपाध्यक्ष , जिजाबा कारंडे तालुका उपाध्यक्ष, दिलीप कदम, सरपंच, उपसरपंच, शेतकरी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकर्यांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर प्रवीण दरेकर म्हणाले, महाराष्ट्रभर अशीच परिस्थिती असून जगाचा पोशिंदा समजला जाणाऱ्या बळीराजाला यावेळी मदतीची आवश्यकता आहे. राज्य शासनाने तात्काळ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देणे आवश्यक आहे. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांनी खचून न जाता परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी भाजपा कटिबद्ध असून प्रसंगी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ केल्यास भाजप महा विकास आघाडी सरकारला मदत देण्यासाठी भाग पडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
भाजप सातारा तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे म्हणाले, कि सोनवडी, गजवडी, कारी ही गावे परळी खोऱ्यामध्ये मोडतात. परळी खोरे हा भाग दुर्गम आणि अति पावसाचा समजला जातो. येथील स्थानिक शेतकरी दिवसभर शेतात कष्ट करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने भात, नाचणी, वरी या पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने तात्काळ आर्थिक मदतीचा हात द्यावा.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |