01:05pm | Oct 19, 2020 |
सातारा : अतिवृष्टीमुळे शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेले पिक नष्ट झाले आहे. सातारा आणि जावली तालुका हा डोंगरी भाग आहे. या परिसरात पावसामुळे भात, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही भागात नाचणी, भुईमूग, ऊस याही पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्याची पिके शेतातच नष्ट झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाने ६५ मी.मी. पर्जन्यमानाचा निकष न लावता आणि प्रस्ताव तयार करुन पाठवायचाय म्हणून घाईगडबड न करता गांभिर्याने पंचनामे करावेत. पंचनामा करताना एकही शेतकरी वंचीत राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशा सक्त सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकार्यांना केल्या.
अतिवृष्टीमुळे सातारा आणि जावली मतदारसंघातील असंख्य शेतकर्यांची भात, सोयाबीन यासह नाचणी, भुईमूग, ऊस आदी पिके नष्ट झाली असून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे योग्य पध्दतीने होवून शेतकर्यांना शासनाची मदत मिळावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. प्रत्यक्ष शेतात जावून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि उपस्थित अधिकार्यांना पंचनामे करताना कोणीही वंचीत राहू नये याबाबत सुचना केल्या. सातारा तालुक्यातील कण्हेर, वेळेकामथी, चोरगेवाडी आदी परिसरात पाहणी करताना आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, तहसिलदार आशा होळकर, सहायक गटविस्तार अधिकारी संजय ढमाळ, मंडल कृषी अधिकारी संतोष पवार, बी.एन. केवटे, ए.के. पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. जावली तालुक्यातील मोरावळे व परिसरातील पिक नुकसानीची पाहणी करताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत तहसिलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुध्दे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि शेतकरी उपस्थित होते.
शेती पिके शेतातच नष्ट झाली असून शेतकर्यांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. ज्या भागात ६५ मी.मी. पाऊस झाला असेल त्या भागातील पंचनामे करण्याचा शासनाचा निकष आहे. असे असले तरी अनेक गावांमध्ये ६५ मी.मी. पाऊस झाला नसला तरीही पाऊस, वादळवार्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाचा हा निकष न लावता प्रशासनाने सर्वच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत. सरकारने आदेश दिला म्हणून प्रस्ताव पाठवायचे म्हणून घाईगडबडीत कसेतरी पंचनामे करुन कागदी घोडे पुढे सरकवू नयेत, अशा सक्त सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकार्यांना केल्या. तसेच सरसकट नुकसानीचे पंचनामे करुन सुयोग्य पध्दतीने प्रस्ताव शासनाकडे सादर करा आणि हे करताना नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचीत राहू नये, नंतर कोणत्याही शेतकर्याची तक्रार येवू नये याची काळजीपुर्वक खबरदारी घ्या, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकार्यांना सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |