03:58pm | May 25, 2020 |
नवी दिल्ली: “देशातील वातावरण आणि मूड बदलण्यासाठी क्रीडा स्पर्धा होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आयपीएल सुरू झाल्यास, त्याचा मोठा परिणाम दिसून येईल,” असं धवन म्हणाला. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यू याच्याशी चर्चा करताना तो बोलत होता. त्यानं पुढे सांगितले की,”प्रत्येकाच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आयपीएल झाल्यास ते आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल. शिवाय त्यामाध्यमातून जगभरातील लोकांमध्ये सकारात्मकताही पसरण्यास मदत होईल.”
कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगवर (आयपीएल) अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे. देशातील सद्यस्थिती पाहता, आता तरी ती खेळवली जाईल, याची शक्यता फार कमी आहे. पण, आयपीएल खेळवायला हवी, असं मत भारताचा सलामीवीर शिखर धवननं व्यक्त केलं आहे आणि त्यामागे त्यानं एक लॉजिकही सांगितलं आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 55 लाखांच्या वर गेला आहे. त्यापैकी 23 लाख रुग्ण बरे झाले आहेत, परंतु जवळपास साडेतीन लाख रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 38, 917 इतकी झाली आहे. त्यापैकी 57,721 रुग्ण बरे झाले आहेत, तर 4 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटात आयपीएलच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता पसरवण्यात मदत होईल आणि लोकांचं मनही प्रसन्न राहिल, असं मत धवननं व्यक्त केलं. त्यामुळे यंदा आयपीएल होईल अशी आशा त्याला आहे. 29 मार्च ते 24 मे या कालावधीत आयपीएल होणं अपेक्षित होतं, परंतु कोरोनामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) पुढील सुचनेपर्यंत लीग स्थगित करावी लागली आहे.
ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या जागी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल खेळवण्यात येईल अशी चर्चा आहे. ”आयपीएल होईल, अशी आशा व्यक्त करतो. मी नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करतो. त्यामुळे आयपीएल झाल्यास ते सर्वांसाठी चांगलं असेल. आयपीएल प्रेक्षकांविना झाल्यास, आम्ही ते दिवस मिस करू. चाहत्यांसमोर खेळण्याची मजा काही निराळीच असते.”
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |