12:37pm | Nov 25, 2020 |
सातारा : गेल्या काही महिन्यांपासून सातारा भाजपचा शहराध्यक्ष पक्षाच्या 'पत्रक', ' निवेदन'काराची भूमिका पार पडू लागल्याने जिल्हा भाजपमध्ये प्रसिद्धी प्रमुखाची वानवा आहे की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. एखादे आंदोलन झाल्यानंतर हा पठ्ठ्या केवळ दहा मिनिटातच तयार बातमीसह फोटो माध्यमांना पाठवत असल्यामुळे भाजपचे आंदोलन सर्वसामान्य नागरिकांसाठी का पदाधिकाऱ्यांच्या प्रसिद्धीसाठी हा नविन प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. भाजप हा ध्येय, धोरणाने चालणारा पक्ष असल्याचे सांगितले जात असल्यामुळे अशा प्रसिद्धीसाठी हपापलेल्या पदाधिकाऱ्याला ज्येष्ठ नेत्यांनी आता वेसण घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
भाजपा हा नेहमीच नवीन युवा चेहऱ्यांना राजकारणात संधी देत असतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः देशाचे युवकच देशाचे भविष्य आहेत, असे वेगवेगळ्या सभांमध्ये सांगत असतात.
याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. सर्वच राजकीय पक्षांनी राजकारणात युवा चेहर्यांना संधी देण्याची गरज निर्माण झाली आहेच. मात्र संधीचे सर्वसामान्य नागरिकांसाठी सोने करणारा युवक हवा बाऊ करणारा नव्हे. भाजपाने टेक वर्षभरापूर्वी साताऱ्यातील एका युवा चेहऱ्याला शहराध्यक्ष केले. कालांतराने त्याला सातारा नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदही दिले. (स्वीकृत नगरसेवक पदावर असताना शहराच्या विकासात त्याने काय योगदान दिले, याचे विमोचन आम्ही योग्यवेळी करणार आहोतच.) राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले. विद्यमान सरकारच्या चुकीच्या ध्येय, धोरणांच्या विरोधात आवाज उठवणे, शासनाच्या विविध लाभदायी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून देणे हे विरोधी पक्षाचे प्रमुख काम आहेच. हे सर्वश्रुत आहेच. गेल्या सहा महिन्यात जिल्हा भाजप आणि सातारा शहर भाजप यांच्यावतीने विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात आली. आंदोलन करणे हा त्यांचा अधिकारच आहे, मात्र त्या आंदोलनांचा बाऊ करणे हे कितपत योग्य आहे याचा विचार होण्याची गरज आहे. सातारा शहराचा भाजपचा विद्यमान शहराध्यक्ष आंदोलन झाल्या-झाल्या त्या आंदोलनाचे निवेदन फोटो आणि सविस्तर बातमी केवळ दहा ते पंधरा मिनिटात पाठवत असल्यामुळे ही आंदोलने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी आहे का स्वतःची पाठ थोपटून घेत प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहेत हे कळायला मार्ग नाही.
मुळात भाजप हा खूप मोठा पक्ष होऊ लागला आहे. या पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी जिल्हानिहाय प्रसिद्धीप्रमुख यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. प्रसिद्धीप्रमुख नसल्याचा संपूर्ण फायदा संबंधित शहराध्यक्ष घेत असून आपले फोटो आणि बातम्या कशा छापून येतील येतील याकडे त्याचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रसिद्धी पिसासू पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जिल्हाध्यक्षांचे निरोपही त्याच्याकडूनच
सातारा शहर अथवा परिसरात भाजपाचे आंदोलन पदाधिकारी मेळावा अथवा पत्रकार परिषद असो भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा निरोपही सातारा भाजप शहराध्यक्षच्या व्हाट्सअप वरून येत आहेत. भाजप सत्तेत असताना जिल्हाध्यक्ष स्वत: माध्यमांच्या संपर्कात होते, मग आत्ताच त्यांना मध्यस्थांची गरज का वाटू लागली आहे, याचे स्पष्टीकरण त्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |