04:58pm | Jul 25, 2020 |
बुध: ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणे हे चुकीचे असून लोकशाहीची थट्टा आहे, त्या सरपंच व ग्रामपंचायतील सदस्य यांना संधी द्या, अशी मागणी रिपाई (आठवले) गटाने गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच राज्य सरकारने चालू मार्च- एप्रिल ते डिसेंबर महिन्यामध्ये कार्यकाल संपणार्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलून त्याठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला असून त्याचे सर्वाधिकार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे अशा निर्णयाचा रिपाई (आठवले) गट खटाव तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून आज गावांच्या विकासाचा केंद्र असलेल्या ग्रामपंचायतीवर स्वतःच्या मर्जीचा प्रशासक नेमून लोकशाहीची थट्टा केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हे एका पक्षाचे लोकप्रतिनिधी असतात. ते स्वतःच्या पक्षाच्या विचारधारेचे काम करतात. प्रसंगी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांना अधिक संधी देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपल्या मर्जीच्या व्यक्तीला प्रशासक म्हणून नेमून गावाचे सर्व राजकारण स्वतःच्या हातात कसे येईल व आपल्या पक्षाचा फायदा कसा होईल हे पाहिले जाईल.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या वाईट काळामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची तसेच कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता गावांमध्ये अतिशय चांगली कामगिरी बजावत आहे. त्यामुळे त्यांनाच पुन्हा मुदत वाढवून संधी देण्यात यावी, अथवा त्यांची त्यांच्यातीलच सदस्यांना प्रशासक म्हणून पुढील काही महिने पुन्हा एकदा जबाबदारी द्यावी, अन्यथा येणार्या काळामध्ये जिल्हाअध्यक्ष अशोक गायकवाड (बापु) यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
निवेदन देतेवेळी रिपाई (आठवले) गटाचे नेते गणेश भोसले, मयुर बनसोडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष कुनाल गडाकुंश, अर्जुन भालेराव, मयुर कांबळे, सुरज भोसले आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |