02:29pm | Oct 08, 2021 |
सातारा : नेहेमीचेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे अनेकजण खाण्याचा कंटाळा करुन तब्येत बिघडवून घेतात. असे होवू नये म्हणून उपवासाला निरनिराळ्या पदार्थांचे पर्याय शोधायला हवेत. हा शोध सोपा जावा यासाठी काही खास पाककृती नवरात्री निमित्त..
रताळ्यांमधे मोठ्या प्रमाणावर फायबर असते, त्याचा उपयोग पचन सुधारण्याकामी होतो. त्यामुळे उपवासाला रताळी आणि रताळ्याचे पदार्थ खाण्याला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास हे परंपरेप्रमाणे, कोणी आवडीने, कोणी र्शध्देने करतात. पण नऊ दिवस उपवास ही सोपी गोष्ट नाही. या उपवासांनी आत्मिक बळ वाढते हे खरे असले तरी या नऊ दिवसात आपण स्वत: उपवासाच्या नावाखाली खाण्यापिण्याची आबाळ करुन घेतली तर अशक्तपणा आणि थकवा येतो. त्यासाठी उपवासाचा आहार पोषक आणि संतुलित ठेवायला हवा. पण नेहेमीचेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो.त्यामुळे अनेकजणी खाण्याचा कंटाळा करुन तब्येत बिघडवून घेतात. असे होवू नये म्हणून उपवासाला निरनिराळ्या पदार्थांचे पर्याय शोधायला हवेत. हा शोध सोपा जावा यासाठी काही खास पाककृती नवरात्री निमित्त..
नवरात्रीच्या उपवासासाठी बाजारात रताळी मोठ्या प्रमाणात दिसतात. या रताळ्यांचा उपयोग करुन पौष्टिक ते चवदार असे अनेक पदार्थ करता येतात.
उपवासाला रताळी का खावीत?
रताळ्याद्वारे आपल्याला आरोग्य आणि स्वाद दोन्हीही मिळते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यातल्या ओल्या वातावरणात रताळी खाणे आरोग्यास लाभदायक मानले जाते. रक्तदाबाचा त्रास, मधुमेह यात रताळी खाणे फायदेशीर ठरते तर अशक्तपणा घालवण्यासाठीही रताळी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. रताळ्यात अ आणि ए जीवनसत्त्वं, खनिज, बीटा केरोटिन आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात. रताळ्यावर झालेले अभ्यास सांगतात की, रताळ्यामधे अँण्टि एजिंग गुणधर्मही असतात. रताळ्यांमधे मोठ्या प्रमाणावर फायबर असते, त्याचा उपयोग पचन सुधारण्याकामी होतो. त्यामुळे उपवासाला रताळी आणि रताळ्याचे पदार्थ खाण्याला विशेष महत्त्व आहे.
रताळ्याची खीर
रताळ्याची खीर करण्यासाठी 3-4 मध्यम आकाराची रताळी, अर्धा लिटर दूध, अर्धा कप साखर, 1 छोटा चमचा तूप, 1 मोठा चमचा बारीक चिरलेले बदाम आणि पाव चमचा वेलची पावडर घ्यावी.
आधी रताळी स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. रताळी छिलून साल काढून मग किसून घ्यावीत. एका कढईत एक चमचा तूप घालून ते गरम करावे. त्यात रताळ्याचा किस घालून तो दोन तीन मिनिटे परतून घ्यावा. मग त्यात दूध घालून रताळ्याचा किस शिजू द्यावा. यात घातलेले दूध अर्धं होवू द्यावे. मग त्यात साखर, बदामाचे काप, वेलची पावडर घालावी. खीर ढवळून घ्यावी. गॅस बंद करुन खीर थंड होवू द्यावी.
रताळ्याचे कबाब
कबाब करण्यासाठी दोन मध्यम आकाराची उकडलेली रताळी, दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, एक इंच आलं किसलेले, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, पाव चमचा मिरे पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा सैंघव मीठ घ्यावे.
कबाब करण्यासाठी सर्वात आधी उकडलेली रताळी आणि बटाटे सोलून मग ते कुस्करुन घ्यावेत. कढईत दोन चमचे तेल घालावे. ते गरम झाले की त्यात कुस्करलेली रताळी आणि बटाटे घालून मिश्रण चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात सैंधव, जिरे पूड, मिर पूड, किसलेले आले, चिरलेल्य मिरच्या आणि कोथिंबीर घालावी. हे सर्व जिन्नस छान एकजीव करुन घ्यावे. या मिश्रणाचे छोटे चोटे गोळे करावेत. एक नॉनस्टिक पॅन गरम करुन त्यावर थोडे तेल सोडावे. रताळ्याचे कबाब शेकण्यासाठी त्यावर ठेवावे. हे कबाब दोन्ही बाजुंनी छान सोनेरी शेकून घ्यावेत. हे कबात शॅलो फ्राय करण्याऐवजी तेलात तळून घेतले तरी चालतात. पण आरोग्याचा विचार करता रताळ्याचे कबाब उत्तम आहेत.
रताळ्याचा पराठा
उपवासाला शरीराला ऊर्जा देणारा पराठी म्हणून रताळ्याचा पराठा केला जातो. रताळ्याचा पराठा करण्यासाठी अर्धा किलो रताळी, 200 ग्रॅम शिंगाड्याच पीठ, 200 ग्रॅम राजगिर्याच पीठ, साजूक तूप आणि वेलची पावडर घ्यावी.
पराठे करताना आधी रताळी उकडून घ्यावीत. मग ती सोलून कुस्करुन घ्यावीत. कढईत थोडे तूप घालून मंद आचेवर कुस्करलेरी रताळी परतावीत. परताना खमंग वास सुटला की त्यात वेलची पावडर घालून हे मिश्रण थंड होवू द्यावे.
तोपर्यंत पराठ्यांसाठी लागणारे पीठ मळून घ्यावे. यासाठी शिंगाड्याचे आणि राजगिर्याचे पीठ एकत्र करुन पाण्यात मळून घ्यावे. थोडा वेळ पीठ सेट होवू द्यावे. त्यानंतर बटाट्याचा पराठा करतो तसा हा पराठा करावा. त्यासाठी थोडे सारण घ्यावे. आणि ते एका छोट्या लाटीच्या छोट्या पोळीत भरावे. बटाट्याच्या पराठ्याप्रमाणे रताळ्याचा हा पराठा शेकून घ्यावा. शेकताना पराठ्यावर तेल किंवा तूप सोडावे. पण हे पराठे तुपावर शेकल्याने ते आरोग्यदायी होतात आणि खमंगही लागतात.
रताळ्याचे चाट
रताळ्याचे चाट तयार करण्यासाठी 4 रताळी, मीठ, चिमूटभर सैंधव मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा चाट मसाला, चिरलेली कोथिंबीर आणि आध्या लिंबाचा रस घ्यावा.
सर्वात आधी रताळी उकडून थंड होवू द्यावीत. मग रताळी सोलून ती गोल गोल आकारात कापावीत. त्यावर चवीनुसार साधं मीठ, सैंधव मीठ, मिरे पूड, लाल तिखट आणि चाट मसाला घालावा. हलक्या हाताने रताळ्याच्या फोडी हलवून सर्व मसाले छान एकत्र करुन घ्यावेत. एका ताटात रताळ्याचे चाट काढून त्यावर लिंबाचा रस घालावा. पुन्हा रताळ्याच्या फोडी हलवून घ्याव्यात. शेवटी त्यावर कोथिंबीर पेरावी.
रताळ्याचा हलवा
रताळ्याचा हलवा हा उत्तर भारतात करतात. रताळ्याचा हलवा करण्यासाठी पाव किलो रताळी, अर्धा चमचा वेलची पूड, 100 ग्रॅम साजूक तूप, आवडीनुसार पत्री खडीसाखर किंवा ब्राऊन शुगर आणि सुकामेवा घ्यावा.
रताळ्यचा हलवा करताना रताळी आधी उकडून गार करुन सोलून घ्यावीत. मग ती कुस्करुन घ्यावीत. कढईत मंद आचेवर तूप गरम करावे. कुस्करलेली रताळी तुपात घालून छान भाजून घ्यावीत. रताळ्याचा रंग बदलेपर्यंत ते परतत राहावे. रंग बदलला, खमंग वास सुटला की त्यात वेलची पावडर, खडीसाखर घालावी. साखर विरघळेपर्यंत हलवा हलवत राहावा.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |