01:44pm | Aug 05, 2021 |
टोकियो : भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील 41 वर्षापासूनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला. कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा पराभव करून देशाला ऐतिहासिक असा विजय मिळवला. याआधी भारताने ऑलिम्पिकमध्ये 1980 साली अखेरचे पदक जिंकले होते. तेव्हा मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताने पुन्हा एकदा हॉकीतील सुवर्णयुगाची सुरुवात केली आहे.
पाच ऑगस्ट रोजी झालेल्या कास्य पदकाच्या लढतीत जर्मनीने दुसर्याच मिनिटाला गोल करून धडाकेबाज सुरूवात केली. पहिल्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा जर्मनीकडे 1-0 अशी आघाडी होती. या क्वॉर्टरच्या अखेरच्या काही मिनिटात जर्मनीला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारताने त्यांना गोल करू दिली नाही. जर्मनीने दुसर्याच मिनिटाला गोल केल्याने भारताची बचाव फळी अलर्ट झाली.
दुसर्या क्वॉर्टरमध्ये भारताने सुरुवातीच्या काही मिनिटात गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. पण जर्मनीने एकापाठोपाठ एक गोल करून 3-1 अशी मोठी आघाडी घेतली. भारत ही लढत गमवतोय की काय असे वाटत असताना पहिला हाफ संपण्याच्या आधी भारताने गोलचा धडाका लावला आणि 3-3 अशी बरोबरी केली.
तिसर्या क्वॉर्टरमध्ये सुरुवातीलाच रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने भारतासाठी आणखी एक गोल करून 5-3 अशी आघाडी केली. तिसर्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा भारताने आघाडी कायम ठेवली होती. चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारताने आघाडी कामय ठेवली. अखेरच्या 4 मिनिटात जर्मनीने गोलकीपरला बाहेर केले आणि गोल करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. शेवटच्या मिनिटाला देखील जर्मनीला गोल करण्याची संधी होती.
झालं असं की, सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होता. गोलकीपरशिवाय खेळणार्या जर्मनीला सामन्यातील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त वेळ किंवा पेनल्टी शूट आऊटपर्यंत सामना नेण्यासाठी सामनाबरोबरीत सोडवणं आवश्यक होतं. याच प्रयत्नात असतानाच अगदी सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास 41 वर्षांनी पदकावर नाव कोरणार होता. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणार्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. हा गोल झाला असता तर सामना अतिरिक्त वेळेत गेला असता आणि तिथेही गोल झाला नसता तर पेनल्टी शूट आऊटने विजेता निश्चित करण्यात आला असता. मात्र भारतीय संघाने आपला संयम कायम राखत सामना 5-4 च्या फरकाने जिंकला.
प्रतिस्पर्धी संघाचे मनसुबे उधळून लावणारा श्रीजेश
आपल्याकडे अनेक पदके आहेत, पण ऑलिम्पिकचं पदक खूप दिवसांपासून हुलकावणी देत आहे, या स्वप्नासाठी मी माझ्या आयुष्यात खूप त्याग केला आहे... टोकियो ऑलिम्पिकला जाण्यापूर्वीचे हे शब्द आहेत भारतीय हॉकी संघाचा स्टार गोलकीपर पी.आर. श्रीजेशचे. जेव्हा भारतीय हॉकी संघ टोकियोला रवाना झाला, तेव्हा भारताचा 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ या वेळी संपेल असे क्वचितच कोणाला वाटले असेल. इतक्या दिवसांपासूनची प्रदीर्घ प्रतीक्षा आज संपुष्टात आली आणि श्रीजेशचे अपूर्ण स्वप्न सुद्धा पूर्ण झाले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला. या प्रवासाचा नायक ठरलेल्या श्रीजेशचे योगदान भारतीयांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरेल.
आमचा विजय कोरोना योद्ध्यांना समर्पित : कर्णधार मनप्रीत सिंग
तब्बल 41 वर्षांनी भारताने हॉकीमध्ये पदक मिळवलं असून सुवर्णअक्षरात लिहिलं जाईल अशी कामगिरी केली आहे. भारताने बलाढ्य अशा जर्मनीचा 5-4 फरकाने पराभव केला आणि कांस्यपदकावर नाव कोरलं. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने हा विजय कोरोना योद्धे आणि पहिल्या फळीतील कर्मचार्यांसाठी समर्पित करत असल्याचं म्हटलं आहे.
हे पदक आपल्या देशातील सर्व कोरोना योद्धे आणि पहिल्या फळीतील कर्मचार्यांसाठी आहे, अशी भावना मनप्रीतने सामना संपल्यानंतर व्यक्त केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |