08:45pm | May 13, 2022 |
सातारा : संभाजीराजे हे छत्रपती असल्याने त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा आणि लढण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी भाजपसोबतच रहावे. त्याचा बहुजन मराठी समाजाला फायदा होईल. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याने ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी निर्णय बदलून भाजपसोबतच राहावे, असे स्पष्ट मत रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
मंत्री आठवले सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोणती भूमिका घ्यायची हा अधिकार संभाजीराजे यांना आहे. कारण छत्रपती असल्याने ते निर्णय घेऊ शकतात. त्यांना स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे पण त्यांनी भाजपसोबत रहावे. काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाऊन ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय बदलावा.
इंधन दरवाढ, महागाई हे विषय भाजपला आगामी निवडणुकीत अडचणीचे ठरणार का, यावर मंत्री आठवले म्हणाले, महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी करण्यासाठी सरकारने आणखी काही कर कमी केले पाहिजेत. केंद्राकडून राज्याला मिळणारे जीएसटीचे पैसे मिळावेत, यासाठी आम्ही अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याशी बोलणार आहे.
राज्यात भाजपचे सरकार नाही म्हणून आम्ही महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही. शरद पवारांनी साताऱ्यातील जकातवाडी येथील कार्यक्रमात सादर केलेल्या कवितेवरून भाजपने टीकेची झोड उठवली आहे. याविषयी विचारले असता आठवले म्हणाले, पवार साहेबांनी हिंदू नाराज होतील अशी कविता करू नये आणि भाजप नाराज होईल अशी कविता म्हणू नये, अशी मिश्किल टिपणी केली.
आगामी लोकसभा निवडणूक मी शिर्डीतून लढावी, अशी राधाकृष्ण विखे-पाटील यांची इच्छा आहे. त्यामुळे मी शिर्डीतून लढणार आहे. जोपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत मला मंत्रिपद मिळणार आहे. तसेच भाजपमधील कोणीही पंतप्रधान झाला तरी मला मंत्रिपद मिळणार आहे.
देशातील दलित समाज भाजपसोबत आहे. रिपब्लिकन पक्षाला उत्तर प्रदेशात चांगली संधी आहे. मी लवकरच उत्तर प्रदेशाचा दौरा करणार असून दौऱ्यात अनेकांशी भेटीगाठी होतील. तसेच आम्ही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट मागितली आहे. रिपब्लिकन पक्ष हा चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे. आमच्या पक्षाला पॉलिटिकल इमेज नाही. भाजपसोबत जाऊन रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपद मिळालेले आहे. भविष्यात रिपब्लिकन पक्षाला चांगले दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |