04:16pm | Jan 22, 2021 |
सातारा: कोरोना संकट काळाने आर्थिक संकटांचा सामना करणार्या वाहन धारकांना आता खासगी वित्तीय संस्था, बँका तसेच फायनान्स कंपन्यांकडून त्रास दिला जात आहे. त्यांच्याकडून केली जाणारी कर्ज वसुली पद्धत अत्यंत चुकीची असून त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात यावा, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरबीआय गव्हर्नर यांना पत्राद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लॉकडाऊन काळ संपताच आता खासगी बँका, वित्तीय संस्थांनी कर्जवसुली मोहिम तीव्र केली आहे. याविरोधात बर्याच वाहनधारकांनी चुकीच्या पध्दतीने सुरू असलेली कर्जवसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी करत राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली होती. दि.22 मार्चपासून कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण बाजारपेठच ठप्प होती. मार्चपूर्वी खासगी वित्तीय संस्था व बँकांमधून अनेकांनी वाहतूक व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. परंतू लॉकडाऊन काळात जवळपास आठ महिने वाहने उभी असल्याने दैनंदिन गरजा भागवणेही मुश्किल झाले. अशा आर्थिक संकटाचा सामना वाहनधारक करत असतानाही फायनान्स कंपनी व खासगी बँकांनी वाहनधारकांकडून कर्जाचे हप्ते मागण्यास सुरवात केली आहे.
केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे काही काळ परतफेडीसाठी सूट मिळाली असली तरी कोरोना संकट काळाने विस्कटलेली आर्थिक घडी सावरायला वेळ लागणार आहे. असे असतानाही कर्ज वसुलीसाठी कर्जदारांवर दबाव आणला जात आहे. कर्जवसुलीसाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. याबाबत कर्ज धारकांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. यासाठी आरबीआयने चुकीच्या पद्धतीने कर्जवसुली करणार्या वित्तीय संस्था व बँकांवर वचक ठेवावा, अशी विनंती राज ठाकरे यांनी आरबीआय गव्हर्नर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, कोरोना संकट काळातील टाळेबंदी संपुष्टात येताच अनेक वाहनधारकांनी चुकीच्या पद्धतीने होणार्या कर्ज वसुली बाबत राज ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरबीआय गव्हर्नर यांच्याकडे हे पत्र पाठवले असल्याचे सांगितले जात आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |