11:42am | Dec 02, 2021 |
सातारा : जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने व थंडीने खटाव व वाई परिसरातील सुमारे 35 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार झाल्या आहेत. तसेच 10 अत्यवस्थ असून या पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
खटाव परिसरात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसाने मेघलदरे वाडी (ता. खटाव) येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांच्या लहान मोठ्या अशा एकूण 15 शेळ्या व मेंढ्या थंडीने गारठून जागीच ठार झाल्याची घटना घडली. यापूर्वी कोरोनाने हैराण झालेला बळीराजाला पुन्हा एकदा निसर्गाने फटका दिल्याने येथील शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. सबंधित घटनेचा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून त्या पशुपालकांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मेघलदरे वाडी येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी डोंगरातून शेळ्यामेंढ्या चारून आणून घराशेजारील अंगणात बांधल्या होत्या. दरम्यान रात्री अकराच्या सुमाास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कुमार व कुटुंबीयांची तारांबळ उडवली. पाऊस एवढा प्रचंड होता की कुटुंब सहजासहजी घराबाहेर पडूच शकत न्हवते. तरीही जीव धोक्यात घालून जवळ पास मिळेल तिथं शेळ्या मेंढ्या सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न मदने व कुटुंबीयांनी केला. मात्र तोपर्यंत शेळ्यामेंढ्या खूप गारठल्या होत्या परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे मदने यांनी सांगितले.
दरम्यान पशुपालक बाळू मदने यांनी सांगितले की रात्रभर शेळ्या व मेंढ्या पावसातच उभ्या होत्या. पावसामुळे चिखल झाला होता व बसायला जागा नसल्यामळे काकडून त्यांचा प्राण गेला. दरम्यान परिसरात रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटाका बसला आहे. रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे ओढे नाल्यांना पुर आला आहे. शेतकर्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची चिंता शेतकरीवर्गामधून व्यक्त केली जात आहे.
वाईत 20 बकर्या ठार; दहा अत्यवस्थ
भिरडाची वाडी, भुईंज (ता वाई) येथील शिवाजी शंकर धायगुडे हा मेंढपाळ बकर्यांचा कळप घेऊन देगाव येथील शिवारात थांबला होता. बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे अचानक पावसाचा जोर वाढला. पाऊस आणि हवामानात वाढलेल्या गारठ्यामुळे बकर्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी आठ वाजता एकूण 20 बकर्यांचा मृत्यू झाल्याने व दहा अत्यवस्थ असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
घटनेची माहिती वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना मिळताच त्यांनी शासकीय यंत्रणा घटनास्थळी पाठवली. ते स्वतः भेट देण्यासाठी घटनास्थळाकडे निघाले आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |