काबूल : अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी सरसावलेल्या तालिबानने भारताला धमकी दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये भारतीय लष्कर दाखल झाल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. लष्करी हस्तक्षेप करण्याआधी भारताने दुसऱ्या देशांची झालेली परिस्थिती पाहावी असेही तालिबानने म्हटले आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये भारताने केलेल्या विकास कामांबद्दल तालिबानने कौतुकही केले आहे.
तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहेल शाहीनने वृत्तसंस्था एएनआयला मुलाखत दिली. शाहीनने म्हटले की, भारत आपल्या सैन्याला अफगाणिस्तानमध्ये पाठवणार असेल आणि भारतीय सैन्य कायम इथेच राहणार असेल तर त्यांच्यासाठी चांगले राहणार नाही. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या इतर देशांच्या सैनिकांची काय अवस्था झाली हे भारताने पाहिले असेल. शाहीनने पुढे म्हटले की, भारताने अफगाणिस्तानला मदत केली आहे. त्याचे कौतुक केले आहे.
शाहीनने म्हटले की, भारताने अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी धरण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्प व इतर विकासकामे केली. अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या आर्थिक संपन्नतेसाठी केलेल्या कामाचे आम्ही कौतुक करत आहोत. भारतीय शिष्टमंडळासोबत भेट झाली नसल्याचेही शाहीनने स्पष्ट केले. शाहीनने सांगितले की, कोणतीही बैठक झाली नाही. मात्र, दोहातील एका बैठकी दरम्यान भारताचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
शाहीनने म्हटले की, तालिबानकडून इतर देशांचे दूतावास, राजनयिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आम्ही कोणत्याही देशाच्या दूतावासाला अथवा अधिकाऱ्यांना लक्ष्य करत नाही. आम्ही हे वारंवार स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमधील एका गुरुद्वारावरून शीख धर्मियांचा ध्वज निशाण साहिब हटवण्यात आले होते. तालिबानने हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत होता. हे आरोप शाहीनने फेटाळून लावले. शाहीनने म्हटले की, शीख समुदायाने स्वत:हून तो झेंडा काढला होता. जेव्हा तालिबानी सुरक्षा अधिकारी त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांनी चौकशी केली. कोणी त्रास देऊ नये यासाठी झेंडा काढण्यात आला होता. तालिबानच्या लोकांनी समजूत काढल्यानंतर निशाण साहिब फडकवण्यात आला.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |