06:12pm | Feb 12, 2022 |
पाटण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यानातील कोअर झोनमधील व रत्नागिरी, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्याच्या सीमेवर दुर्गम ठिकाणी वसलेल्या मौजे मळे, कोळणे व पाथरपुंज या गावांच्या 36 वर्षापासून रखडलेल्या पुर्नवसनाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे.
पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील, हेळवाक वन्यजीवचे वनक्षेत्रपाल झोपाळे, मंडल अधिकारी जगंम व जांगडे, तलाठी, ग्रामसेवक व पंचायत समिती अशा तिन्ही विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावातच दोन दिवस मुक्काम ठोकत संकलन यादीतील त्रुटी दुरूस्तीचे काम पूर्ण केले. तसेच अन्य समस्याही जाणून घेतल्या. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, तिन्ही गावातील लोकांच्या मागणीचा विचार करून गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरीकांचे प्रलंबित असणारे प्रश्न सोडविण्यासाठीच आम्ही येथे आलो आहे. २००८ च्या कटऑफ डेटच्या अनुषंगाने कायद्याच्या चौकटीत राहूनच गेल्या दोन दिवसात तिन्ही गावातील संकलन यादीतील त्रृटी दूर केल्या आहेत. याचा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू. आमच्या पध्दतीने जे काही करता येईल, तेवढी मदत आम्ही करू, असे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी तिन्ही गावातील ग्रामस्थांना आश्वासित केले.
मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांच्या पुर्नवसनाचा प्रश्न १९८५ सालापासून शासन दरबारी लोंबकळत पडला आहे. ५ जानेवारी २०१० ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली. चांदोली राष्ट्रीय उद्यान घोषित केले. वारणेच्या पाणलोट क्षेत्रात ही गावे येतात. १९९३ साली या तिन्ही गावांचा समावेश चांदोली अभयारण्यात झाल्याचे स्थानिकांना समजले. त्यानंतर २००६ साली गाभा क्षेत्रात ही गावे समाविष्ट झाली.
तिन्ही गावच्या पुनर्वसनाचा लढा १९९३ पासून प्रशासनासोबत सुरू आहे. पुर्नवसनाच्या भिजत घोंगड्यावर प्रत्येक जून महिन्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येते व वनविभागाकडून जागा दाखवणे, कागदपत्रे मागणी केली जाते. दिवाळीनंतर पुन्हा प्रकल्पग्रस्तांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या तिन्ही गावातील नागरीकांनी ११ जानेवारी रोजी असहकार आंदोलन करून कोळणे येथील वनविभागाच्या संरक्षण कुटीसह गेट बंद करून शासनाच्या दिरंगाईचा निषेध व्यक्त केला होता. यावेळी महसूल विभागाच्या मध्यवस्तीने व वन्यजीव अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देवून बारा मागण्यांसंदर्भात लेखी स्वरूपात दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते.
२७ व २८ जानेवारी रोजी पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसीलदार रमेश पाटील, हेळवाक वन्यजीवचे वनक्षेत्रपाल झोपाळे, मंडल अधिकारी जगंम, जांगडे, तलाठी, ग्रामसेवक आदी. महसूल, वन व पंचायत समिती विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दोन दिवस मुक्काम ठोकत मळे, कोळणे व पाथरपुंज याठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या.
यामध्ये मळे येथील १४०, कोळणे येथील ७९ व पाथरपुंज येथील १०६ याप्रमाणे बाधित खातेदारांच्या संकलन यादी दुरूस्तीचे काम करण्यात आले. त्यामुळे तिन्ही गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी पोलीस पाटील साळुंखे, तलाठी आर. एस. टिपुगडे, तलाठी निलेश भाग्यवंत, कोतवाल अरूण चाळके, जग्ननाथ सपकाळ, ग्रामसेवक सूर्यवंशी, माजी ग्रामसेवक पवार, ग्रामसेवक, यादव, पाटील यांच्यासह मळे, कोळणे व पाथरपुंज पुर्नवसन कृती समितीचे मार्गदर्शक दीपक कांबळे, भरत चाळके, समन्वयक संजय कांबळे, संजय पवार आदींसह तिन्ही गावातील बाधित खातेदार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्त जनता अधिकाऱ्यिंचे ऋणी
आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोकांच्या मागणीवरून अधिकाऱ्यांनी आमच्या गावात दोन दिवस मुक्काम केला, ही मोठी गोष्ट आहे. सर्व वृत्तपत्रांनी पुर्नवसनाच्या मागणीचा विषय प्रभावीपणे मांडला. याचाच परिपाक शासन दरबारी हा विषय पुर्नवसन विभागापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळेच येथील लोक कसे जीवन जगतात ते शासनाला कळाले. मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावातील जनता आपली ऋणी आहे.
- संजय पवार (प्रकल्पग्रस्त)
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |