11:45am | Sep 24, 2021 |
पुसेगाव : शेतकरी पोटच्या गोळ्याहून अधिक माया बैलांवर करतो. त्यांना पौष्टिक खाद्य देतो. शर्यतीच्या बैलांना वर्षभर अन्य काम देखील दिले जात नाही. अनेकदा बळीराजा आणि बैलाचे भावनिक बंध जुळलेले अनुभवायला मिळतात. मग हा शेतकरी आपल्या घरातील सदस्यांपैकीच एक असणाऱ्या बैलावर अत्याचार कसा करेल. बैल हा शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असल्याने बैलगाड्यांच्या शर्यतीत बैलांवर अत्याचार केला जातो हे म्हणणे चुकीचे ठरेल. असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा गोवा राज्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांनी व्यक्त केले.
गोवा राज्याच्या लोकायुक्तपदी निवड झाल्याबद्दल अंबादास जोशी यांचा पुसेगाव येथील श्री सेवागिरी मंदिरात नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त विजय जाधव (आण्णा), माजी उपसरपंच प्रकाश जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे, जेष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, जीवन जाधव, बैलगाडी शर्यत असोसिएशनचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, या शर्यतींच्या माध्यमातून फक्त उच्च प्रतीच्या बैलांची निवड होऊन त्यांचा वापर फक्त संकरासाठी साठी केला जातो. या बैलांपासून पैदास होणाऱ्या खिल्लार बैलांचा शेतीच्या कामासाठी तर गाईंचा विविध उत्पादनांसाठी वापर केला जातो. त्यामुळे या जातिवंत खिल्लार बैलांना बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बऱ्यापैकी या खिल्लार जनावरांवर अवलंबून असते. बैलांचे शेतकऱ्यांशी असलेले भावनिक नाते तसेच त्यांचे शेतीच्या कामातील व धार्मिक महत्त्व लक्षात घेता बैलगाडी शर्यत पुन्हा एकदा सुरू होण्याची गरज आहे.
माजी उपसरपंच प्रकाश जाधव म्हणाले, पूर्वी बैलगाडी शर्यत व शेतीसाठी खिल्लार बैलांची मागणी मोठी असायची. हे बैल सांभाळण्याचा खर्च जास्त असतो. आता या बैलांचा वापरच राहिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा बैल खरेदी करण्याचा कल कमी झाला असून खिलार जातच नामशेष होईल की काय, अशी भीती आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी खिल्लार वंशाची जपणूक होणे गरजेचे आहे. जोशी साहेबांच्या माध्यमातून गेली दोन वर्षे बैलगाडी शर्यत सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी ऍनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या सदस्यांना खिल्लार जातीच्या बैलांचे शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्व पटवून दिल्यामुळे ते देखील अनुकूल झाले आहेत. शासनाने सुद्धा शेतकऱ्यांची बाजू लक्षात घेता नियम व अटी घालून बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्याची गरज आहे.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय जाधव, सुत्रसंचलन जीवन जाधव तर आभार मानाजी घाडगे यांनी मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |