03:43pm | Apr 24, 2021 |
वॉशिंग्टन: कोरोना महामारीने अक्षरक्ष: थैमान घातले आहे. त्यातच एक धक्कादायक खुलासा समोर येत आहे. पुढील मे महिन्यात भारतात करोनाची लाट आणखी जोर पकडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भारतात दररोज पाच हजार करोनाबाधितांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान भारतातील तीन लाख नागरिकांना करोनामुळे प्राण गमवावे लागण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेटरिक्स अॅण्ड एवोल्यूशनच्यावतीने करण्यात आलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. 15 एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, भारतात करोनाच्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले. भारतात आगामी दिवसात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. या संशोधनासाठी भारतातील मृत्यू आणि संसर्गाच्या दराचा अभ्यास करण्यात आला. यावर्षी मे महिन्याच्या मध्यात भारतातील करोना बळींची संख्या 5600 इतकी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
12 एप्रिल ते 1 ऑगस्ट या काळात अतिरिक्त तीन लाख 29 हजार मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधनानुसार, सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या दरम्यानच्या काळात भारतात करोनाबाधितांच्या दररोजच्या संख्येत घट होती. मात्र, आता त्यात वाढ होताना दिसत आहे. दररोज करोनाबाधित आढळण्याचा दर मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या एप्रिल महिन्यात दुप्पट असल्याचे दिसून आले आहे.या संशोधनानुसार, देशव्यापी लसीकरणामुळे जुलै महिन्याच्या अखेरिस 85 हजार 600 जणांचे प्राण वाचवले जाऊ शकतात.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |