कोल्हापूर: राज्यातील सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने श्रमिक वर्ग सध्या तणावाखाली आहे. राज्य सरकारने पुढील दोन तीन महिन्यांसाठी कामगार, मजूर, श्रमिक, सर्वसामान्यांना दिलासा दिला पाहिजे, असं सांगताना चंद्रकांत पाटील यांनी 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा अशी मागणी केली आहे. करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने ‘माझे अंगण, माझे रणांगण’ आंदोलनाची हाक दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आंदोलन करताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याने 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करावं अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरावं. जोपर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री रस्त्यावर उतरुन संवाद साधत नाहीत तोपर्यंत गोष्टी सुधारणार नाहीत. सर्व काळजी घेऊन त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि लोकांना सांगितल पाहिजे की, आम्ही प्रशासनाच्या बैठका घेत आहोत, विरोधी पक्षांसोबत बैठका घेत आहोत. त्यांनी जिवावर उदार व्हावं असं म्हणत नाही. सगळी काळजी घेऊन ते रस्त्यावर उतरणार नाहीत तोपर्यंत यंत्रणा हालणार नाही. बाहेर फिरताना अनेक गोष्टी, चुका लक्षात येतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
गेल्या 60 दिवसांत मुख्यमंत्री घराबाहेर पडायला तयार नाहीत. मातोश्री हे मुख्यमंत्री निवासस्थान असू शकत नाही. वर्षा आवडत नसेल तर त्यांनी इतर कोणती जागा निवडावी. परंतू सरकारी निवासस्थानीच राहिलं पाहिजे. मातोश्री कॉलनीतील लोकांना किती त्रास होत असेल याचा विचार करा. सर्व सरकारी अधिकारी, नेत्यांनी उठून मातोश्रीवर जायचं, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पोलिसांवरील हल्ले वाढत आहेत. दोन महिने आम्ही सरकारला सहकार्य केलं. पण सरकार आपली काही भूमिका बजावणार नाही, काम करणार नाही आणि सहकार्य करा असं म्हणणार असेल तर हे बरोबर नाही. राज्य सरकारनेही आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे. आरोग्य व्यवस्था नीट करण्यासाठी एकत्रित रचना केली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |