02:07pm | Feb 09, 2021 |
चेन्नई : ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर शानदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा २२७ धावांनी पराभव झाला. अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा खराब कामगिरी केली. भारताचा दुसरा डाव फक्त १९७ धावात संपुष्ठात आला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. करोनानंतर भारतात झालेल्या या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील याच मैदानावर १३ फेब्रुवारीपासून सूरू होणार आहे.
चेपॉकच्या पाटा विकेटवर अखेरच्या दिवशी भारतीय संघाला ३८१ तर इंग्लंडला ९ विकेटची गरज होती. काल रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजार यांनी पाचव्या दिवशी भारतीय डावाची सुरूवात केली. जॅक लीचने पुजाराला १६ धावांवर बाद करून भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर गिलने वेगाने खेळ करत सलग तिसऱ्या कसोटीत अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर जेम्स एडरसनने त्याची बोल्ड काढली.
गिल बाद झाल्यानंतर कर्णधार कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे मैदानावर होते. गिलला बाद केल्यानंतरच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये एडरसनने रहाणेला देखील माघारी पाठवले. त्याने प्रथम LBW केले. मैदानावरील अंपायरने नाबाद दिल्याने डीआरएसचा फायदा इंग्लंडला झाला नाही. पण त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर रहाणेला त्याने बोल्ड काढले. रहाणे बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद ९२ अशी झाली.
रहाणेच्या जागी आलेल्या ऋषभ पंतकडून ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि ब्रिस्बेन प्रमाणे मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्याला देखील एडरसनने ११ धावांवर बाद केले. ११० वर भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये गेला. ऑस्ट्रेलियातील चौथ्या आणि या कसोटीतील पहिल्या डावात अर्धशतक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला डोमिनिक बेसने शून्यावर बाद केले. सुंदर बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ६ बाद ११७ अशी झाली.
मैदानावर विराट आणि अश्विन होते. या दोघांनी १७१ धावसंख्येपर्यंत संघाला नेले. लीचने अश्विनला बाद केले आणि भारताला सातवा धक्का दिला. त्यानंतर विराटने कसोटीतील २४वे अर्धशतक झळकावले. विराट आणि नदीम किती वेळ मैदानावर थांबतात याची उत्सुकता होती. पण स्टोक्सने विराटची बोल्ड घेतली आणि विजयातील मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर नदीमला लीचने तर जोफ्रा आर्चरने बुमराहला बाद करत विजयावर शिक्कामोर्तम केले.
दुसऱ्या डावात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. तर इंग्लंडकडून लीचने सर्वाधिक चार, एडरसनने तीन विकेट तर अन्य गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |