04:33pm | May 27, 2022 |
कोल्हापूर : एका विभागीय उपसंचालकांनी बदली भत्ता ३५ हजार १८१ सह एकूण ७४ हजार रुपयांचा प्रवास भत्ता घेतला आहे. अवघ्या सहा महिन्यात इतकी रक्कम प्रवास भत्त्यापोटी घेतल्याने त्यांच्या प्रवास भत्त्याची (सं) 'भाजी' अक्षरशः 'खराट' झालीय. घरी 'ट्रॕव्हल्सने' गेलेल्या तिकिटांचे पैसे देखील यातूनच वसूल केल्याची दबकी चर्चा आता विभागात सुरु आहे. शासनाचे या नुकसानीची चौकशी करुन निवृत्तीपूर्वी वसूल करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
महाराष्ट्र शासनातील ६ व्या वेतन आयोगानुसार ६६०० ग्रेड पे असणाऱ्या अधिकाऱ्यास शासकीय वाहनाने मुंबईला प्रवास केल्यास २९० रुपये, अ वर्ग शहरासाठी १८०, ब-१ वर्गासाठी १४० व अन्य शहरासाठी १२० रुपये दै भत्ता मिळतो. शासकीय वाहनाने प्रवास केला असल्यास वरीलप्रमाणे भत्ता मिळतो. तसेच खासगी वाहनाने प्रवास केल्यास वाहनाच्या तिकिटाचे पैसेही मिळतात. परंतु, हा प्रवास शासकीय कामकाजासाठीच असायला हवा.
या कार्यालयात खूप पूर्वी सहायक संचालक पदावर 'कामकाज' केल्याने त्यांना इथल्या कामकाजाच 'चांगलाच अनुभव' आहे. विभागीय उपसंचालक पदाचा कार्यभार १० सप्टेंबर रोजी घेतला. सहा महिन्यात निवृत्त होणाऱ्या 'सायबांनी' सुरुवातीपासूनच पर्यटनावर भर ठेवत, विभागीय बैठकांचे नियोजनही ११ फेब्रुवारीला चांदोली अभयारण्य, ११ मार्चला आजरा येथील चित्री प्रकल्पावर करण्याची जबाबदारी संबंधित सांगली आणि कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांवर सोपवली होती. याशिवाय विभागातील तीन जिल्ह्यासह सीमाभागातील बेळगाव येथील विविध दौरेही आले.
त्या निमित्तानं साप्ताहिक, छोट्या दैनिकांच्या संपादकांना 'गाठून' दररोज रात्री उशिरापर्यंत 'बसणं' ही त्यांची खासियत. त्यात त्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांनाही सोडले नाही. सुरुवातीला असणारा पाहूणचार नंतर बळे-'बळे' होवू लागल्याने डोळे 'पांढरं' होवू लागले. पारगड, पन्हाळगड पायथ्याशी असणारे फार्म, गगनगड, राधानगरी-दाजीपूर अभयारण्य, दंडोबा, कराड-सातारा, नृसिंहवाडी, बेळगाव, मालवण, सावंतवाडी, शिरोडा अशी कामकाजाच्या नावावर केवळ सहल काढून इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करायचा उद्योग सध्या जोरात सुरु आहे. 'सायबाचा सत्कार करा,' अशी आगाऊ सूचना 'एकनाथा' मार्फत देवून सत्काराबरोबरच पेढे, बासुंदी, कुंदा, खाणं-'पिणं' जे मिळेल ते गोळा करत 'मागितकराची' भूमिका पार पाडायची. पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भाव पाहता हा शासनावर अनावश्यक पडलेला सहल बोजा वसूल करायलाच हवा.
कोल्हापुरात पदभार घेतल्यावर सुरुवातीला एक-दोन दिवसांच्या कामकाजानंतर ते मुंबईत मंत्रालयात परतायचे. मंत्रालयातही त्यांच्याकडे अन्य कामकाज दिल्याची चर्चा सायबांना 'एक' निष्ठ वाटणारा (परंतु, प्रत्यक्षात वेगळीच चर्चा करणारा) 'नाथ' विभागात करायचा. (याच 'नाथा' ला पदोन्नतीवर याच कार्यालयात बसायचे आहे.) परंतु, वास्तवात त्यांच्याकडे तसे कोणतेच कामकाज नव्हते. हे नंतर 'माहिती' घेतल्यावर उघड झाले. त्यांची कोल्हापुरात पदोन्नतीवर बदली झाल्यावर मंत्रालयात बळकावलेली केबीनच काय त्यावरील नावाची पाटीही गायब झालेली. असे असतानाही मंत्रालयातील कामकाजाच्या नावावर यांच्या घरी फेऱ्या होत राहिल्या.
होळीच्या दिवशी पर्यटनावर असणाऱ्या सायबाचे परस्पर 'गायब असण्याचे' बींग फूटले. मग त्यांची कानउघाडणी प्रत्यक्षात महासंचालकांनीच केली. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात एकटेच राहण्याचा निर्णय घेतला. असे असतानाही कोषागाराच्या मंजुरीनुसार ३५ हजार १८१ रुपयांचा बदली प्रवास भत्ता दि. २७ जानेवारी २०२२ रोजी घेतला. दि, १८ जानेवारीला २१ हजार ४९५ आणि २ हजार ५८५ रुपयांचा प्रवास भत्ता घेतला आहे. २३ फेब्रुवारीला ९ हजार ५००, १७ मार्चरोजी ५ हजार २९० रुपयांचा असा एकूण ७४ हजार ५१ रुपयांचा भत्ता घेतला आहे. शासकीय विश्रामगृहाचे १०० रुपयेही भरण्याची प्रवृत्ती नसणाऱ्या सायबानं सकाळी उद्घाटन झालेल्या द्राक्ष महोत्सवातील 'पेटीही' मागून घेत, रात्री थेट बेलापूरला घरी नेली. कोकणीमेव्याबरोबरच, हवी तेवढी 'घेतल्यानंतर' बूच लावून उर्वरीत बाटली बॕगेत टाकून घरी न्यायची सवय जुनीच असल्याची चर्चा जुने-जाणते सोबत काम केलेले करतात.
वास्तविक बिलासोबत जोडलेल्या वाहन भाडे पावत्या, तिकिट बील हे आता तपासावे लागेल. त्याचबरोबर मंत्रालयात खरोखरच इतक्यावेळेला कामकाजासाठी बोलावले होते का? बोलावले असेल तर वरिष्ठांचे आदेश सोबत जोडले आहेत का? या प्रश्नांची उकल आता महासंचालकांनाच करावी लागेल. काहीही असले तरी अवघ्या सहा महिन्यातील घेतलेला हा प्रवास भत्ता डोळे विस्फारणाराच आहे. एकूणच कोल्हापुरी भाषेत सांगायचे झाल्यास,' उपसंचालकांच्या प्रवासभत्याची (सं) 'भाजी' जरा जास्तच 'खराट' झाली, शासनाचे तोंड मात्र अळणी झालंय!'.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |