सातारा: राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मंगळवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबत दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, राज्यामध्ये पावसाला सुरूवात झाल्यानंतर शेतकर्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मोठ्या प्रमाणात सोयाबीनची उगवण झाली नाही. याबाबत शेतकर्यांकडून राज्यभरात तक्रारीचा सूर आलेल्यानंतर संबंधित बियाणे व कंपन्यांची चौकशी करण्यात आली होती. बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने उगवण कमी झाल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. सोयाबीनसह मूग, उडीद ही पिके बर्यापैकी आली मात्र गेल्या दोन महिन्यांत राज्यभर झालेल्या वादळी पावसामुळे हातात आलेली पिके कापण्यापूर्वीच हातची गेली.
सध्याच्या परिस्थितीत राज्य शासनाने शेतकर्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, प्रति हेक्टर 50 हजार रूपयांची मदत जाहीर करावी, कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावा, सोयाबीन, धान, कपाशी खरेदी हेतू सरकारी यंत्रणा उभी करावी, पूर्व विदर्भात माननिर्मित पुरामुळे झालेली नुकसान भरपाई कोकणाप्रमाणे देण्यात यावी, राज्यात जेथे जेथे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, विदर्भ व मराठवाडा विभागात सोयाबीनवर कीड आल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. त्याचे उत्पादन प्रमाणही निम्यापेक्षा कमी येत आहे. गेल्या महिन्यांत अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र भागामध्ये कपाशीचे बोंड सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संत्रा पिकाचेही नुकसान झाले आहे. त्या शेतकर्यांना मदत मिळाली नाही. एकूणच राज्यातील परिस्थिती निराशाजनक आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकर्यांना मदत मिळणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
काशिनाथ शेवते, प्रकाश खरात, शैलेश भोईटे, डॉ.रमाकांत साठे, दिनकर बरकडे, चंद्रकांत बरकडे नितीन खरात यावेळी उपस्थित होते.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |