सातारा : दहिवडी (ता.माण) येथून माण - खटाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जयकुमार गोरे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आर.पी.आयचे दोन्ही गट, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य शक्ती, जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, 2009 पासून आजपर्यंत मला प्रत्येक निवडणूकीत माण - खटावच्या जनतेने भरभरून प्रेम आणि आशिर्वाद दिले आहेत. दुष्काळाचा कलंक पुसण्याचा शब्द मी उरमोडी, जिहे-कठापूर, तारळीचे पाणी आणून अंतिम टप्प्यात आणला आहे. मतदारसंघात मी शब्द दिल्याप्रमाणे कॅनॉलचे पाणी आले आहे. आता माण-खटावमध्ये दुष्काळाचा कलंक पुसून ऊसाची बागायती शेती होत आहे. कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. आता होत असलेली निवडणूक दुष्काळाचा कलंक पुसण्याची अंतिम निवडणूक आहे. याच मातीने सर्वसामान्य कुटुंबातील जयकुमारला तीन वेळा आमदार केले आहे. जोपर्यंत जनता माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच अडवू शकत नाही. मी जनतेची सेवा करतोय, दिलेले शब्द पूर्ण करतोय. त्यामुळे मी निवडणूकीत उभा राहिलो कि आमदार नक्कीच होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
...तोपर्यंत मला कुणीच अडवू शकत नाही
विराट जनसमुदायाच्या साथीने जयकुमार गोरे यांचा अर्ज दाखल
by Team Satara Today | published on : 29 October 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

गळफास घेऊन एकाची आत्महत्या
June 30, 2025

दुकानातून सुमारे 65 हजारांच्या साहित्याची चोरी
June 30, 2025

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
June 30, 2025

राज्यात पुढील ५ दिवस अतिवृष्टी
June 30, 2025

पिंगळी घाटात प्लायवूडचा टेम्पो पेटला
June 30, 2025

झेडपी निवडणुकीनंतर मी आमदार होणार : शेखर गोरे
June 30, 2025

वारीतच २ वारकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू
June 30, 2025

दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांकडून कराडात धिंड
June 30, 2025

वृद्धेला लाखाचा गंडा
June 30, 2025

दाम्पत्याच्या घरी चोरी
June 30, 2025

राहत्या घरातून एकजण बेपत्ता
June 29, 2025

विकासनगर येथे 65 हजारांची घरफोडी
June 29, 2025