सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ जुलै १९२८ रोजी सातारा जिल्हा न्यायालयात एका केससाठी आले होते. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांना धननीची बाग येथील छ.शाहू बोर्डिंगमध्ये भेट देण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यामुळे बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भोजनाची व्यवस्था कर्मवीर अण्णांनी केली होती. परंतु,बाबासाहेब यांनी तेथील विद्यार्थ्यांसोबतच जेवण घेतले होते. बाबासाहेब यांनी त्या बोर्डींगला रु.२० /- ची मदत केली होती. (तेव्हाची ती रक्कम मोठीच होती.) म्हणूनच त्या दिवसाचे औचित्य साधून वडूजचे शीलवंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल वीर,डॉ.जगताप,कु.सानिका जगताप आदींनी बोर्डींगला भेट देऊन बी.एल.माने यांच्यावतीने मुलांना खाऊ वाटप केले. बोर्डिंगचे अधिक्षक प्रशांत गुजरे यांनी स्वागत केले.माणिक आढाव यांनी बाबासाहेब यांच्या जीवनावर आधारित गीत गायले. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शिवाय, ज्यांचे आई किंवा वडील हयात नाहीत अशी मुले राहतात. जालना, बीड व धाराशिवनगर येथून शिक्षणासाठी शाहु बोर्डिंगमध्ये राहत असून सर्व मुले बाबासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते. त्याच छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये मुले शिक्षण घेत आहेत. प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. तेव्हा शिलवन्त यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, माने,वीर, आढाव, जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.