सातारा : मणिपूर मधील महिलांवरील अत्याचाराच्या घटना या मानवी संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या आहेत. या जगभर छी:थू झालेल्या घटनेबाबत निषेध व सहवेदना व्यक्त करण्यासाठी सातारा येथे सोमवार दि ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता निषेध व सहवेदना मोर्चा सातारा शहरातील संवेदनशील नागरिकांचे राष्ट्रीयता जागर अभियान, सातारा यांच्या वतीने काढण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रातील संवेदनशील व भारतीय संविधानावर विश्वास ठेवणारे नागरिक बंधू भगिनी या मोर्चात सहभागी होणार आहेत.
सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २३ रोजी सकाळी ११ वाजता राजवाडा (गोलबागेपासून) खालील रस्त्याने (कर्मवीर भाऊराव पाटील पथ) हा मोर्चा जाणार आहे. मोर्चाच्या वतीने पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चाच्या अग्रभागी तिरंगा ध्वज असेल.
अभागी, असहाय्य मणिपूरी कुकी जनतेप्रती सद्भावना दर्शवणे आणि या देशाच्या लेकी ज्यांची दिवसाढवळ्या हजारों लोकांच्या समोर नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. बलात्कार करण्यात आले. अशा दुर्दैवी लेकींसाठी सहवेदना दाखवण्यासाठी हा मोर्चा आहे. या मोर्चात संवेदनशील भावा - बहिणींनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीयता जागर अभियान सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मणिपूर येथील घटनांच्या निषेधार्थ सातारला सोमवारी सहवेदना मोर्चा
राष्ट्रीयता जागर अभियानच्या वतीने आयोजन
by Team Satara Today | published on : 30 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा