नेपाळमध्ये बस नदीत कोसळली

१४ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील लोकांचाही होता समावेश

by Team Satara Today | published on : 23 August 2024


नेपाळ : नेपाळमध्ये शुक्रवारी मोठा बस अपघात झाला. नेपाळमध्ये ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. उत्तर प्रदेशातील ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. या भीषण दुर्घटनेत १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथली नोंदणीकृत बस येथून प्रवाशांना घेऊन नेपाळकडे निघाली होती. बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेपाळच्या तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात उत्तर प्रदेशातील बस मर्स्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पोलीस कार्यालय तनहुचे डीएसपी दीपकुमार राय यांनी म्हटलं की, उत्तर प्रदेश एफटी ७६२३ क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये तब्बल ४० प्रवासी होती आणि त्यातील १४ जणांचा मृत्यू झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
 ‘त्या’ अनाथाश्रम चालक महिलेवर दुसरा गुन्हा दाखल
पुढील बातमी
बांग्लादेशातील विद्यमान सरकारने शेख हसीना यांचा डिप्लोमेटिक पासपोर्ट रद्द करण्याची केली घोषणा

संबंधित बातम्या