रोज सकाळी एक डाळिंब खाणे आरोग्यासाठी लाभदायक

by Team Satara Today | published on : 29 May 2025


सकाळी नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करणं आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. विशेषतः डाळिंब खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. रोज सकाळी नाश्त्यामध्ये एक डाळिंब खाल्ल्याने आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक बदल बघायला मिळतात. नाश्त्यामध्ये डाळिंब खाल्ल्याने कोणते फायदे होतात, ते जाणून घेऊयात. 

नाश्त्यामध्ये रोज एक डाळिंब खाण्याचे फायदे 

सूज कमी होते

डाळिंबामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे शरीरातील सूज कमी होते. हे खाल्ल्याने संधिवात आणि क्रॉनिक इन्फ्लेमेशन अशा समस्यांपासून आराम मिळतो. तसेच यामध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे पेशींचं नुकसान होण्याचा धोका टळतो. त्यामुळे सूज कमी होते.

ह्रदयाचे आरोग्य सुधारते

डाळिंब हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, रक्तवाहिन्यांचं काम नीट चालण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

त्वचेसाठी उपयुक्त

डाळिंब हा व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन-सीमुळे त्वचा उजळते. डार्क स्पॉट्स कमी होतात. तसेच अँटी-ऑक्सिडंट्समुळे फ्री रॅडिकल्स डॅमेज कमी होण्यास मदत होते. सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं. सोरायसिस आणि रोजेशियमुळे त्वचेवर येणारी सूज व लालसरपणा यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणांमुळे कमी होतो. डाळिंबामध्ये भरपूर पाणी असतं. त्यामुळे ग्लोइंग स्किनसाठी डाळिंबाचं सेवन करावं. 

साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत

डाळिंबाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. तसेच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

रोगप्रतिकारक शक्ती

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते. त्यामुळे पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकला इत्यादीपासून संरक्षण होतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

ऊर्जा

डाळिंबामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यात फ्रक्टोज आणि ग्लूकोज असते. त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. सकाळी नाश्त्यामध्ये डाळिंब खाल्ल्यामुळे दिवसभर एनर्जी टिकून राहते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पळशीचा युवक माण नदीत बेपत्ता
पुढील बातमी
देशमुख सिटीत भरला फूड फेअर

संबंधित बातम्या