नवी दिल्ली : चीनच्या हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) वाढत्या हालचालींना तोंड देण्यासाठी भारताने पाणबुडी प्रतिबंधक शक्ती वाढविण्याकडे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) नुकतीच दोन स्वदेशी आण्विक पाणबुड्या तयार करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भारतीय नौदलाची क्षमता लक्षणीय वाढेल. पाणबुड्यांच्या बांधणीमुळे भारताची ताकद हिंद महासागर आणि दक्षिण चीन समुद्रात वाढणार आहे. तसेच भारताने तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेपेक्षा पाणबुड्यांना अधिक प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते.
चीनला रोखण्यासाठी निर्णायक ठरतील
मिळालेलल्या माहितुनसार या आण्विक पाणबुड्या विशाखापट्टणममधील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये बांधल्या जाणार आहेत. तसेच या पाणबुड्या अरिहंत वर्गापेक्षा वेगळ्या असतील आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. अलीकडे हिंद महासागरात चीनची सात ते आठ युद्धनौका आणि तीन ते चार निमलष्करी जहाजे नियमितपणे उपस्थित असतात. या पार्श्वभूमीवर, भारताने आण्विक पाणबुड्यांचा प्रकल्प सुरू करून आपल्या संरक्षणाची पातळी वाढवण्यासाठी हे पाऊल उचलेले आहे.
अणुऊर्जेवर चालणाऱ्या या पाणबुड्या दीर्घकाळ पाण्याखाली राहण्यास सक्षम : भारताच्या नवीन आण्विक पाणबुड्या हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या उपस्थितीला रोखण्यासाठी निर्णायक ठरतील असे सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, अणुऊर्जेवर चालणाऱ्या या पाणबुड्या दीर्घकाळ पाण्याखाली राहण्यास सक्षम आहेत, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि सुरक्षा वाढेल. डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या जरी कार्यक्षम असल्या तरी त्यांना नियमितपणे पूर्ण भरण्यासाठी वर यावे लागते. ज्यामुळे त्या हल्ल्यांसाठी असुरक्षित ठरतात. आण्विक पाणबुड्या अशा मर्यादांपासून मुक्त असतात आणि मोठ्या प्रमाणावर समुद्र पाळत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
भारतीय नौदलाची ताकद वाढली :
भारताने या पाणबुड्यांसह जगातील सहावा अणु त्रय देश बनण्याची क्षमता मिळवली आहे. ज्यामुळे भारताची संरक्षण क्षमता आणखी बळकट झाली आहे. चीनच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आण्विक पाणबुड्या बांधण्याचा भारताचा निर्णय हिंदी महासागर क्षेत्रात मजबूत नौदलाचे स्थान राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरतो.