सातारा : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमीहिन कुटुंबांना चार एक जिरायती (कोरडवाहू) जमीन किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) जमिन उपलब्ध करुन देण्यात येते.
शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार संबंधित शेतकऱ्यांकडून जमिन खरेदी करुन त्याच गावातील पात्र लाभार्थ्याला (अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी) जमिन वाटप केली जाईल. अधिक माहितीसाठी व त्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्याने व इच्छुक जमीन विकणाऱ्या शेतकऱ्याने सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा.