कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

इच्छुक जमीन विकणाऱ्या शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 09 December 2024


सातारा : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमीहिन कुटुंबांना चार एक जिरायती (कोरडवाहू) जमीन किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) जमिन उपलब्ध करुन देण्यात येते.

शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार संबंधित शेतकऱ्यांकडून जमिन खरेदी करुन त्याच गावातील पात्र लाभार्थ्याला (अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी) जमिन वाटप केली जाईल. अधिक माहितीसाठी व  त्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्याने व इच्छुक जमीन विकणाऱ्या शेतकऱ्याने सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सीरियातील लोक दमिश्क येथील राष्ट्रपती भवनात घुसले
पुढील बातमी
धाडसी पत्रकाराने वाचविले एकाचे प्राण

संबंधित बातम्या