सातारा : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कॉंग्रेसने जोडे मारो आंदोलन केले. यावेळी पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. तसेच राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला.
मागील काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे महाविकास आघाडीच्यावतीने राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. सातारा येथेही राष्ट्रीय कॉंग्रेसने जोडे मारो आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अन्वर पाशा खान, संदीप माने, रजनी पवार, धनश्री महाडिक, जगन्नाथ कुंभार, अरबाज शेख आदी सहभागी झाले होते.
जिल्हा कॉंग्रेस कमिटीसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे दुर्दैवी घटना आहे. महायुती सरकाराचा कारभार याला कारणीभूत आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. येणार्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
सातारा शहरात कॉंग्रेसचे जोडे मारो आंदोलन
राजकोट पुतळा प्रकरणाचा केला निषेध
by Team Satara Today | published on : 02 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा