सातारा : जनतेच्या प्रश्नांना शिवसैनिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जनतेच्या जवळ जाण्यासाठी शिवसेना उबाठा गट जिल्हयातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे, असे आवाहन शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले.
सातारा येथे हॉटेल द फर्न या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख व उपनेते शिवसेना नितीन बानगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्तर तालुक्याच्या पदाधिकारी यांची बैठक पार पडली त्यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी नितीन बानगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सुधीर भाऊ राउत यांच्या विचारांनी सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्यामधे नवचैतन्य निर्माण झाले. सर्व पदाधिकार्यांना येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण मोठ्या ताकतीने व निष्ठेने काम सुरू करून आपला दबदबा निर्माण करा, असे आदेश बानगुडे यांनी दिले. त्यावेळी मागचे काय झाले याचा विचार न करता आपण तळागाळात जाऊन गोरगरीब जनतेसाठी काम करा. राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व समस्या सोडवा, वेळ प्रसंगी आंदोलन व मोर्चे काढून जनतेचा प्रश्नांना हात घाला, असे आदेश देण्यात आले.
यावेळी शिवसेना उपनेत्या श्रीमती छायाताई शिंदे, कराड उत्तर चे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, सातारा जिल्हा आघाडी अनिताताई जाधव, तालुका संघटक सतीश पाटील, उपजिल्हा संघटक किरण भोसले, तालुका प्रमुख संजय भोसले व विशाल कुंभार सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होतेण.
शिवसेना जिल्हा संघटक सुधीर भाऊ राउत म्हणाले आपल्याला गाव तिथे शाखा उभारून घरा घरात शिवसैनिक तयार करून श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिवसैनिकांना ताकद देणार व स्थानिक स्वराज्य सस्थांमध्ये भगवा फडकवणार आहे.