शिवसेना उबाठा गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन

पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे अधिकार्‍यांचे आश्वासन; सचिन मोहिते यांची माहिती

by Team Satara Today | published on : 19 September 2024


सातारा : शिवसेना उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी गुरुवारी सातार्‍याच्या पूर्व भागातील खंडित पाणी पुरवठ्याच्या विरोधात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले. जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी प्राधिकरणाने पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. यानंतर प्राधिकरण व्यवस्थापनाच्या सूत्रांनी शिवसैनिकांना पाणी पुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. 
गेले आठ दिवस शाहूनगर सातारा येथील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. विद्यमान लोकप्रतिनिधी यांचे संपूर्ण दुर्लक्ष या प्रकरणी होते. याच वेळी शिवसेना उबाठा गटाचे सातारा शहर प्रमुख शिवराज टोणपे यांनी हा विषय जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या कानावर घातला. सर्व पदाधिकारी यांच्या सोबत जिल्हा प्रमुख पाणी पुरवठा कार्यालयात पोहचले असता त्या ठिकाणी एकही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर लिखित स्वरूपात अधिकारी यांनी काही तासात पाणी पुरवठा सुरळीत करू, असे लिहून दिले. त्याप्रमाणे कार्यवाही झाली नाही तर शिवसेनेच्यावतीने कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी तालुका प्रमुख सागर रायते, सुनील पवार, प्रणव सावंत, रवींद्र भणगे, हरी पवार, इम्रान बागवान, आरिफ शेख, अमोल गोसावी, रवींद्र पोळ, परवेझ शेख, अजय सावंत, राहुल मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते. शाहूनगर वासियांनी याबाबत शिवसेना पदाधिकारी यांचे आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इस्रायलच खतरनाक यूनिट-8200 काय आहे?
पुढील बातमी
आनेवाडी टोलनाक्यावर लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू

संबंधित बातम्या