युवकाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू

by Team Satara Today | published on : 13 January 2025


मलकापूर : दुचाकीच्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील युवक जागीच ठार झाला. पुणे-बंगळूर महामार्गावर पाचवड फाटा (नारायणवाडी) परिसरात काल रात्री उशिरा हा अपघात झाला. अविनाश आनंदा लोंढे (वय ३०, रा. बाजार भोगाव, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे अपघातातील मृताचे नाव आहे.

दुभाजकाला धडकून अपघात झाला असण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. पाल यात्रेतून परतताना काल मध्यरात्रीनंतर अपघात झाला. तालुका पोलिसांना सकाळी नऊच्या सुमारास त्याची माहिती समजली.

पोलिस व अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश लोंढे मोटारसायकलने (एमएच ०९ एफएन ५५०४) काल पाल येथे यात्रेसाठी गेले होते. यात्रा आटोपून ते रात्री कोल्हापूरकडे परतताना घरी निघाला होता.

पुणे- बंगळूर महामार्गावर नारायणवाडीच्या हद्दीत पाचवड फाटा येथे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात ते जागीच ठार झाले. दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याची दुचाकी महामार्गाकडेला खड्ड्यात पडली. लोंढे हे महामार्गावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सर्वसामान्यातील असामान्य लोकांच्या कथांनी श्रोते भारावले !
पुढील बातमी
राज्यात थंडीचा जोर कायम

संबंधित बातम्या