टेकलगुडेम : केंद्र आणि राज्य सरकारची रणनीती आणि जवानांच्या पराक्रममुळे बस्तरमधील नक्षलवादाचा खात्मा करण्यात यश येत आहे. बस्तर विभागातील दोन-तीन जिल्हे वगळता ७ जिल्ह्यांमध्ये आता नक्षलवाद सोडून शिक्षण, आरोग्य आणि विकासाची चर्चा आहे. जवानांनी १०० हून अधिक मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे.
बस्तर शिक्षण क्षेत्रात वेगळ्या प्रकारचं पहिलं मॉडेल म्हणून उदयास येत आहे. येथे सीआरपीएफ नक्षलवादी भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. नक्षलवादी संघटनेच्या सीसी मेंबर नक्षलवादी हिडमाच्या पूवर्ती गावात सीआरपीएफने प्रथमच गुरुकुलची स्थापना केली. २००५ मध्ये या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही रस्ता नव्हता, त्यामुळे ही गावं मुख्य प्रवाहापासून तुटली. आता सुमारे १९ वर्षांनंतर २०२४ मध्ये अधिकारी या गावांमध्ये पोहोचू शकले.
गुरुकुलमध्ये ८० हून अधिक मुलं सामील
एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पूवर्ती, टेकलगुडेम येथे शिक्षणामुळे वेगळं वातावरण निर्माण झालं आहे. सीआरपीएफने येथे गुरुकुल स्थापन केलं. यामुळे पूर्ववर्ती टेकलगुडेम येथील गुरुकुलमध्ये ८० हून अधिक मुलं सामील झाली आहेत, ज्यांना एका वर्षापासून शिक्षण दिलं जात आहे.
मुलं घेताहेत शिक्षण
१०० किमी अंतरावर असलेल्या कुआकोंडाच्या पोटाकेबिनमध्ये राहून १० हून अधिक मुलं शिक्षण घेत आहेत. ही ती मुले आहेत, ज्यांच्या पालकांनी परिसरातील वातावरणामुळे मुलांना आश्रमाच्या वसतिगृहात ठेवलं आहे.
तीन गुरुकुल सुरू
डीआयजी आनंद सिंह राजपुरोहित यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन गुरुकुल सुरू आहेत. यामध्ये सीआरपीएफ मुलांसाठी वह्यापुस्तकांची व्यवस्था केली जात आहे. शिकवण्यासोबतच मुलांना खेळासाठी प्रोत्साहित केलं जातं.
सुकमाचे जिल्हा शिक्षण अधिकारी जीआर मांडवी यांनी मुलांचा सर्वेक्षण केला जात आहे. पूवर्ती येथे एक शाळा बांधली जात आहे. शिक्षण सोडलेल्या ३५ मुलांना शाळांशी जोडण्याबाबत पालकांशी संवाद साधला जात आहे.