सातारा : बेडग, ता.मिरज गावच्या दीडशे कुटुंबीयांनी कमानीबाबत आक्रोश करीत मुंबईकडे पायी निघालेल्या आंबेडकरी विचाराचा धगधगत्या अनुयायी यांची इस्लामपूर येथे सातारवासीयांनी भेट घेतली.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, लोकशाहीर संभाजी भगत, अनिल गंगावणे, विजय मांडके, अनिल वीर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यानी भेट दिली.
यावेळी लोकशाहीर भगत यांनी पहाडी गाणी सादर करून महिलांनीच आंबेडकर विचार जागृत ठेवल्याची पोचपावती दिली. या अनुषंगाने विविध उदाहरण देऊन सखोल असे मार्गदर्शन झाले.
शरद पवार यांच्या भगिनी माई एन.डी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.त्या म्हणाल्या, डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या सारख्या महनीय विभूतींना दुष्टप्रवृतींच्या समाजकंटकांनी संपविलेले आहे. तरीसुद्धा डॉ.दाभोळकर, कुलबुर्गी आदींसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कायमस्वरूपी जिवंत राहणार आहेत. असे सांगून त्यांनी आर्थिक मदत देण्यात येईल. असेही जाहीर केले.
यावेळी आंदोलन कर्त्यांनी बेडग ची कर्मकाहानी सांगुन ज्यांनी बाबासाहेबांची स्वागत कमान कायदेशीर असूनही पडलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी केली आहे. याबाबत मुंबईत सकारात्मक चर्चा मंत्र्याबरोबर झाली असून त्यांनी स्वागत कमान उभारणे व जे गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे. अशा बाबी लेखी स्वरूपात दिल्या तरच लॉंगमार्च थांबेल. खरोखरच, आगळा-वेगळा लॉंगमार्च बाबासाहेब यांच्यावर निस्सीम प्रेम असल्याचे द्योतक बायका-पोरासह असलेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रु साक्ष देत होते.