सातारा : सातारा-कास रस्त्यावरील घाटाई कॉर्नर जवळ एकावर पाच जणांनी खुनी हल्ला केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 जुलै रोजी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास वैभव प्रकाश गायकवाड रा. गडकर आळी, सातारा हे त्यांच्या मित्रासमवेत कास बाजू कडून सातारा कडे येत होते. यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून समर्थ अनिल लेंभे पाटील, शुभम राक्षे, सोन्या कांबळे (तिघेही रा. करंजे, ता. सातारा) आणि दोन अनोळखी इसम यांनी घाटाई कॉर्नर जवळ गायकवाड यांच्या गाडीला त्यांची गाडी आडवी मारून गायकवाड यांची गाडी थांबवून, त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर हातातील कोयत्याने आणि तलवारीने डोक्यात वार केले. तसेच लाकडी दांडक्याने हातावर आणि पाठीवर मारून जखमी केले. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.
दरम्यान वरील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
घाटाई कॉर्नर जवळ झाला खुनी हल्ला; न्यायालयाने दिली चार दिवसांची पोलीस कोठडी
by Team Satara Today | published on : 31 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा