01:00pm | Oct 06, 2022 |
नवी दिल्ली : भारतीय संघ आज ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. पण यावेळी भारतीय संघात १४ खेळाडूच होते. विश्वचषकासाठी एका संघात किमान १५ खेळाडू असावे लागतात, पण भारत मात्र आज १४ खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. पण भारताचा हा १५ वा खेळाडू नेमका कोण असणार आहे, ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. रोहित शर्माला बुमराच्या जागी १५ सदस्यीय संघात त्याला मोहम्मद शमीलाच संधी द्यायची आहे, असे स्पष्ट पणे दिसत आहे. त्यामुळे रोहित अजूनही शमी कधी फिट होतो, याकडे लक्ष लावून आहे.
शमीला विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत खेळेल, असे वाटत होते. पण त्याला करोना झाला. त्यानंतर त्याने उपचार घेतले आमि तो विश्रांती करत होता. त्यानंतर शमीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले होते. सध्या तो अकादमीमध्येच आहे. पण त्याची फिटनेस टेस्ट अजूनही झालेली नाही. शमीच्या फिटनेस टेस्टचा अहवाल नेका काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
बुमरा संघाबाहेर गेला आणि त्यानंतर भारताकडे अनुभवी गोलंदाज नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विश्वचषकात शमी पाहिजे, असा जवळपास हट्टच रोहितचा असल्याचे दिसत आहे. कारण शमीकडे गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. तो संघात आला तर भारताची गोलंदाजी अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे रोहितने हा हट्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितसारखेच मत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही आहे. त्यांनाही शमी संघात हवा आहे. त्यामुळे रोहित आणि द्रविड हे दोघेही शमीच्या फिटनेस टेस्टचे नेमके काय होतं, याकडे लक्ष लावून आहेत. त्यामुळे आता शमीच्या फिटनेस टेस्टवर सर्व काही अवलंबून असेल.
शमीची अजूननही फिटनेस टेस्ट घेण्यात आलेली नाही. ज्यावेळी ही टेस्ट होईल आणि त्याचा निकाल जाहीर होईल तेव्हा भारताला १५वा खेळाडू मिळू शकतो. जर शमी फिट असेल तर तो भारताचा १५वा खेळाडू असेल, तर तो फिट नसला तर बुमराच्या जागी दीपक चहर किंवा मोहम्मद सिराज यापैकी एक १५ वा खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे आता शमीच्या फिटनेस टेस्टचा अहवाल नेमका काय येतो,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. शमीसाठी रोहित आणि द्रविड आग्रही आहेत. त्यामुळेच ते शमीच्या फिटनेस टेस्टसाठी थांबलेले आहेत. त्यामुळे या टेस्टची उत्सुकता सर्वांनाच असेल.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |